शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

अडखळलेला साखर हंगाम चांगलाच तापला...

By admin | Updated: November 17, 2015 00:25 IST

पन्नास लाख टन गाळप : राज्यातील ११४ कारखान्यांची धुराडी पेटली; सरासरी उताऱ्यातही वाढ

कोल्हापूर : एकरकमी एफआरपीवरून काहीसा अडखळत सुरू झालेल्या यंदाच्या साखर कारखान्यांच्या हंगामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. राज्यातील ११४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, आतापर्यंत ५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सरासरी साखर उताऱ्यातही वाढ झालेली आहे. साखरेच्या घसरलेल्या दरामुळे राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची एफआरपी थकली होती. साखर पोत्याचे मूल्यांकन व उचल याचे गणित घालविण्यातच नवीन हंगाम कधी सुरू झाला, हेच साखर कारखानदारांना समजले नाही. गत हंगामातील कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांचे देय असल्याने यंदाचा हंगाम कसा सुरू करायचा, या विवंचनेत कारखानदार होते. त्यात शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने कारखानदारांपुढे पेच निर्माण झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये एकरकमी एफआरपीवर ठाम राहत, कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्यातील कारखान्यांची धुराडी पेटली. आतापर्यंत पुणे विभागातील सर्वाधिक ४९ साखर कारखाने सुरू झाले असून, त्यांनी २७ लाख ८५ हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागातील ३० कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील अद्याप पंचगंगा, दौलत, गायकवाड, इंदिरा, महाडिक शुगर्स, राजारामबापू, माणगंगा, महाकाली, तासगाव, निनाईदेवी, यशवंत-खानापूर हे कारखाने थंडच आहेच.