शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अडखळलेला साखर हंगाम चांगलाच तापला...

By admin | Updated: November 17, 2015 00:25 IST

पन्नास लाख टन गाळप : राज्यातील ११४ कारखान्यांची धुराडी पेटली; सरासरी उताऱ्यातही वाढ

कोल्हापूर : एकरकमी एफआरपीवरून काहीसा अडखळत सुरू झालेल्या यंदाच्या साखर कारखान्यांच्या हंगामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. राज्यातील ११४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, आतापर्यंत ५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सरासरी साखर उताऱ्यातही वाढ झालेली आहे. साखरेच्या घसरलेल्या दरामुळे राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची एफआरपी थकली होती. साखर पोत्याचे मूल्यांकन व उचल याचे गणित घालविण्यातच नवीन हंगाम कधी सुरू झाला, हेच साखर कारखानदारांना समजले नाही. गत हंगामातील कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांचे देय असल्याने यंदाचा हंगाम कसा सुरू करायचा, या विवंचनेत कारखानदार होते. त्यात शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने कारखानदारांपुढे पेच निर्माण झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये एकरकमी एफआरपीवर ठाम राहत, कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्यातील कारखान्यांची धुराडी पेटली. आतापर्यंत पुणे विभागातील सर्वाधिक ४९ साखर कारखाने सुरू झाले असून, त्यांनी २७ लाख ८५ हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागातील ३० कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील अद्याप पंचगंगा, दौलत, गायकवाड, इंदिरा, महाडिक शुगर्स, राजारामबापू, माणगंगा, महाकाली, तासगाव, निनाईदेवी, यशवंत-खानापूर हे कारखाने थंडच आहेच.