शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची प्रवासी सेवा तिसऱ्या दिवशीही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील १२ आगारांतून होणारी प्रवासी वाहतूक पूर्णत: थंडावली. त्यामुळे ...

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील १२ आगारांतून होणारी प्रवासी वाहतूक पूर्णत: थंडावली. त्यामुळे या विभागाला सुमारे १ कोटी ५ लाखांचा फटका बसला. यात काहीअंशी जयसिंगपूर, इचलकरंजी आणि गडहिंग्लज विभागात तुरळक बससेवा सुरू होती. मात्र, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभला.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटीच्या कोल्हापूर विभागातील बारा आगारातून रोज मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड, नाशिक अशा राज्याच्या विविध भागात ३५० हून अधिक बसेसद्वारे प्रवासी वाहतूक होते. मात्र, चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्वच बसेस बंद करण्यात आल्या होता. रविवारी दुपारपासून पूर परिस्थिती नसेल अशा जयसिंगपूर, इचलकरंजी व गडहिंग्लज भागात सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांचा त्याला अल्प प्रतिसाद लाभला. दिवसाकाठी ३५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या या विभागाला गेल्या तीन दिवसांत १ कोटी ५ लाखांचा फटका बसला.

एनडीआरएफसह पुरात अडकलेल्यांसाठी ३० बसेस

कुरुंदवाड येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी १९ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर नागरिकांच्या बचावाकरिता आलेल्या एनडीआरएफच्या जवानांकरिता ६ आणि त्याच्यासोबत असलेल्या मालाच्या वाहतुकीसाठी ५ अशा ३० बसेस महामंडळाने शिरोळ परिसरात उपलब्ध करून दिल्या आहेत.

वाहतुक अधिकारीही पुरात कार्यरत

कुरुंदवाड येथे शुक्रवारी (दि.२३) च्या दुपारी एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव तेथील. स्थानकाची पाहणी आणि ‘एनडीआरएफ’च्या पथकाला बसेस ताब्यात देण्यासाठी गेले होते. या दरम्यान कुरुंदवाड व शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे प्रभावित झाला. त्याचा फटका जाधव यांना बसला. त्यांनी एका ओळखीच्या ठिकाणी शुक्रवारी रात्री आसरा घेतला. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी बोटीतून प्रथम शिरोळ आणि त्यानंतर कोल्हापूर गाठले.