शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या मतदारांसाठी इच्छुकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:24 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये हक्काचा मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी इच्छुक, विद्यमान नगरसेवकांकडून धडपड सुरू झाली आहे. ...

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये हक्काचा मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी इच्छुक, विद्यमान नगरसेवकांकडून धडपड सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारपासून मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात आपल्या जवळचे नव मतदारांची नोंदणी कशी जास्त होईल, यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे. नवीन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करणारे सोशल मीडियावरून संदेश पाठविले आहेत.

कोरोनामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. पुढील सहा महिन्यांत कोणत्याहीक्षणी निवडणूक जाहीर होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे काही विद्यमान नगररसेवक आणि इच्छुकांकडून आतापासून जनसंपर्क सुरू केला आहे. आरक्षणाचा विचार करून काहींनी दोन प्रभागांवर डोळा ठेवला आहे. येथील आपले हक्काचे मतदान कोणते याचे अडाखे मांडले जात आहेत. मतदानासाठी किती तारखेपासूनची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार याबाबत अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आलेले नाहीत.

यामध्येच भारत निवडणूक आयोगाने मतदारनोंदणी पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेतला असून, शनिवारी (दि. ५) आणि रविवारी (दि.६) तसेच १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्रावरील नाव, पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे, नाव एका यादीतून दुसऱ्या यादीत स्थलांतरित करणे, मृत व्यक्तीचे नाव वगळणे अशी कामे करता येणार आहेत. यामुळे नुकतेच १८ वर्षे पूर्ण झालेले नवमतदार नोंदणी करण्याची इच्छुकांना पर्वणी आली आहे.

चौकट -

पश्चातापाची वेळ येऊ नये यासाठीच धडपड

महापालिकेची निवडणूक चुरशीने होत असते. केवळ चार ते पाच मताने पराभव झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. जवळच्याच व्यक्ती, कार्यकर्ते अथवा समर्थकाने मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान केले नसल्याचा निकालानंतर पश्चाताप करावा लागू नये म्हणून काहींकडून मतदार नोंदणीसाठी धडपड सुरू आहे.

सोशल मीडियावरून आवाहन

इच्छुकांकडून सोशल मीडियावरून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम व कोणती कागदपत्रे लागणार आहे, याची माहिती या माध्यमातून दिली जात आहे. जास्तीत जास्त नवमतदारांपर्यंत हा संदेश पोहोचविला जात आहे. काही प्रभागात पत्रकाचेही वाटप केले आहे.