शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरता टाळण्यासाठीच निवडणूक स्थगितीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:26 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष होत आले तरी निवडणूक नको अशीच ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष होत आले तरी निवडणूक नको अशीच मानसिकता सत्तारूढ गटाची दिसत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या आडून जेवढी मुदतवाढ मिळेल तेवढी घ्यायची, हा जरी उद्देश असला तरी, गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच संचालक मंडळात फूट पडली आहे. त्यातच जिल्हा बँकेची निवडणूक पुढे गेल्याने विरोधक एकसंधपणे तुटून पडणार असल्यानेच निवडणूक नको, हे उघड गुपित आहे.

संघाच्या मागील निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी सत्तारूढ गटाविरोधात एकाकी झुंज दिली. पाच वर्षात मल्टिस्टेट, व्यवस्थापन खर्चाचे मुद्दे घेऊन विरोधकांनी रान उठवले. मार्च २०२० मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली होती. निवडणूक सुरू व स्थगिती या हिंदोळ्यात सव्वा वर्षाचा कालावधी गेला. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय उपनिबंधकांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली.

त्यावर सत्तारूढ गटाने हरकत घेतली. न्यायालयाच्या आदेशाची स्पष्टता द्या, अशी मागणी करत याचिका दाखल करून निवडणुका स्थगित करण्याचा प्रयत्न आहे. एकेकाळी केव्हाही निवडणुका घेतल्या तरी शड्डू ठोकणाऱ्या सत्तारूढ गटाला निवडणुका का नकोत? असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. आतापर्यंत आनंदराव पाटील-चुयेकर, राजकुमार हत्तरकी, विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, अरूण डोंगळे, रवींद्र आपटे व अरूण नरके या सात संचालकांचा ‘गोकुळ’च्या राजकारणावर प्रभाव राहिला आहे. पाटील-चुयेकर व हत्तरकी यांच्या निधनामुळे आता नरके, आपटे, डोंगळे व दोन पाटील यांची भूमिका महत्वाची आहे. त्यात डोंगळे यांनी उघड बंड केले आहे. आणखी दोन संचालक विरोधकांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेही ताकदीने विरोधात उतरणार आहेत. अशा परिस्थितीत सत्ता राखणे तितकेसे सोपे नाही. यासाठी नेत्यांनी ‘गोकुळ’ व जिल्हा बँक बिनविरोधचा मुद्दा पुढे आणला. मात्र त्याला विरोधकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा बँक पुढे गेली आणि ‘गोकुळ’ची निवडणूक सुरू झाली तर विरोधक एकसंधपणे तुटून पडणार, याची भीती सत्तारूढ गटाला आहे. अशा परिस्थितीत निवडणूक पुढे घालवून काही पॅचवर्क करता येते का? यासाठी धडपड सुरू आहे.

ठरावाच्या व्हॅलिडीटीसमोर प्रश्नचिन्ह

‘गोकुळ’साठी डिसेंबर २०१९ मध्ये संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दिलेले आहेत. आता सव्वा वर्ष पूर्ण झाले तरी निवडणूक न झाल्याने त्या ठरावाच्या व्हॅलिडीटीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कायद्यानुसार सहा महिनेच हे ठरावाचे अस्तित्व जीवंत राहते.

मग ‘गोकुळ’च का?

कोरोनामुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर टाकल्या असताना केवळ ‘गोकुळ’ चीच निवडणूक का? असा सवाल सत्तारूढ गट न्यायालयात उपस्थित करणार आहे.