शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

फुटीरता टाळण्यासाठीच निवडणूक स्थगितीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:26 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष होत आले तरी निवडणूक नको अशीच ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष होत आले तरी निवडणूक नको अशीच मानसिकता सत्तारूढ गटाची दिसत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या आडून जेवढी मुदतवाढ मिळेल तेवढी घ्यायची, हा जरी उद्देश असला तरी, गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच संचालक मंडळात फूट पडली आहे. त्यातच जिल्हा बँकेची निवडणूक पुढे गेल्याने विरोधक एकसंधपणे तुटून पडणार असल्यानेच निवडणूक नको, हे उघड गुपित आहे.

संघाच्या मागील निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी सत्तारूढ गटाविरोधात एकाकी झुंज दिली. पाच वर्षात मल्टिस्टेट, व्यवस्थापन खर्चाचे मुद्दे घेऊन विरोधकांनी रान उठवले. मार्च २०२० मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली होती. निवडणूक सुरू व स्थगिती या हिंदोळ्यात सव्वा वर्षाचा कालावधी गेला. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय उपनिबंधकांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली.

त्यावर सत्तारूढ गटाने हरकत घेतली. न्यायालयाच्या आदेशाची स्पष्टता द्या, अशी मागणी करत याचिका दाखल करून निवडणुका स्थगित करण्याचा प्रयत्न आहे. एकेकाळी केव्हाही निवडणुका घेतल्या तरी शड्डू ठोकणाऱ्या सत्तारूढ गटाला निवडणुका का नकोत? असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. आतापर्यंत आनंदराव पाटील-चुयेकर, राजकुमार हत्तरकी, विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, अरूण डोंगळे, रवींद्र आपटे व अरूण नरके या सात संचालकांचा ‘गोकुळ’च्या राजकारणावर प्रभाव राहिला आहे. पाटील-चुयेकर व हत्तरकी यांच्या निधनामुळे आता नरके, आपटे, डोंगळे व दोन पाटील यांची भूमिका महत्वाची आहे. त्यात डोंगळे यांनी उघड बंड केले आहे. आणखी दोन संचालक विरोधकांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेही ताकदीने विरोधात उतरणार आहेत. अशा परिस्थितीत सत्ता राखणे तितकेसे सोपे नाही. यासाठी नेत्यांनी ‘गोकुळ’ व जिल्हा बँक बिनविरोधचा मुद्दा पुढे आणला. मात्र त्याला विरोधकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा बँक पुढे गेली आणि ‘गोकुळ’ची निवडणूक सुरू झाली तर विरोधक एकसंधपणे तुटून पडणार, याची भीती सत्तारूढ गटाला आहे. अशा परिस्थितीत निवडणूक पुढे घालवून काही पॅचवर्क करता येते का? यासाठी धडपड सुरू आहे.

ठरावाच्या व्हॅलिडीटीसमोर प्रश्नचिन्ह

‘गोकुळ’साठी डिसेंबर २०१९ मध्ये संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दिलेले आहेत. आता सव्वा वर्ष पूर्ण झाले तरी निवडणूक न झाल्याने त्या ठरावाच्या व्हॅलिडीटीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कायद्यानुसार सहा महिनेच हे ठरावाचे अस्तित्व जीवंत राहते.

मग ‘गोकुळ’च का?

कोरोनामुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर टाकल्या असताना केवळ ‘गोकुळ’ चीच निवडणूक का? असा सवाल सत्तारूढ गट न्यायालयात उपस्थित करणार आहे.