शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्रांचा सापांच्या जीवितासाठी संघर्ष

By admin | Updated: September 20, 2015 23:24 IST

सुविधांची मागणी : हजारो सापांना मिळाले जीवदान

संजय माने- टाकळी--साप म्हटले की काठ्या घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न असतो. मात्र टाकळी येथील सर्पमित्रांकडून मात्र सर्प हे शेतकऱ्यांचा मित्र व निसर्गचक्राचा एक भाग असल्याची जाणीव करून देत सापांबद्दल असलेला गैरसमज पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. टाकळीतील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व जातीचे साप पकडून निर्जनस्थळी सोडून जीवदान देण्याचे काम या सर्पमित्रांनी केले आहे. त्यामुळे टाकळी गाव हे सर्पमित्रांचे गाव म्हणून ओळखले जात आहे.विषारी सर्प, नाग, घोणस, फुरसे, मण्यार, अर्धविषारी, मांजऱ्या, हरिण टोळ, बिनविषारी धामण, तस्कर, कुकरी, गवत्या, नानेती, दिवड, डुरक्या घोणस, धुळनागीणसह अशा अनेक प्रकारच्या सापांना मनुष्य वस्तीतून पकडून टाकळीतील सर्पमित्र बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील, अजित पाटील, नितीन पाटील, स्वराज्य पाटील, सम्राट पाटील, प्रवीण देसाई, महावीर पाटील यांच्यासह टाकळीतील शेकडो तरुण गेल्या दहा वर्षात सापांना जीवदान देण्याचे काम करत आहेत. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून, निसर्गचक्रात सापाची महत्त्वाची भूमिका असल्याचेही सर्पमित्रांकडून समजावून सांगण्यात येते. सापाला पकडताना त्यास इजा होऊ नये यासाठी टाकळीतील सर्पमित्रांनी तैवान येथून स्रेक स्टीक मागवली आहे. या स्टीकमुळे सापास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही व त्याला पकडणेही सोपे जाते. सर्पमित्र अनिल इंगवले यांच्याकडून सर्पमित्रांनी साप पकडण्याचे तंत्र अवगत केले आहे. सर्व जातीच्या सापांची माहिती व्हावी म्हणून येथील सर्पमित्रांनी पुण्यातील राजीव गांधी सर्प उद्यानास भेट दिली आहे. सापांविषयीच्या माहितीची विविध पुस्तके, सीडीच्या माध्यमातून सापांची माहिती त्यांनी घेतली आहे. बोलवाड, सुभाषनगर, मल्लेवाडी, एरंडोली, बेडग, शिरोळ, कोल्हापूर जिल्ह्यातील आळतेसह विविध भागातून मनुष्य वस्तीत असलेले साप पकडण्यासाठी टाकळीतील सर्पमित्रांना बोलाविण्यात येते. साप पकडण्यासाठी सर्पमित्रांकडून कोणताही मोबदला घेतला जात नाही.सापांबद्दल ग्रामस्थांत गैरसमज!सापांची प्रणयक्रीडा पाहिल्यास डोळे जातात, साप डाव धरतो, सापाला केस असतात, साप जानावरांचे दूध पितो, असे अनेक गैरसमज ग्रामस्थांत आहेत. मात्र या सर्पमित्रांकडून सर्वकाही समजावून सांगितले जाते. उंदीर पिकांची मोठ्याप्रमाणात नासाडी करतात. उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सापांची संख्याही तितकीच असली पाहिजे. त्यासाठी शेतात साप सोडले जातात.