शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कर्जमुक्तीसाठी संघर्षयात्रा कोल्हापुरात दाखल

By admin | Updated: April 25, 2017 00:12 IST

वरिष्ठ नेत्यांचा सहभाग : दसरा चौक, मुधाळतिट्टा, जयसिंगपुरात आज मेळावा : सात-बारा कोरा करण्याची मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचा सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह इतर पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा सोमवारी रात्री उशिरा कोल्हापुरात पोहोचली. त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि इतर पक्षांचे वरिष्ठ पातळीवरील नेतेही कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास जन्मस्थळाला भेट देऊन कुलस्वामिनी अंबाबाईला कर्जमाफीचे साकडे घालून संघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे.या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तसेच शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे हे कोल्हापुरात सोमवारी रात्री उशिरा दाखल झाले. आज, मंगळवारी पहाटेपर्यंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते दाखल होणार आहेत. कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून जागृती अभियान सुरू होते. विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी डिजिटल फलक उभारून संघर्ष यात्रेबाबत जागृती केली आहे. अंबाबाईला साकडे घालणार सोमवारी, सायंकाळी सोलापूर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नागरी सत्कार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रात्री उशिरा कोल्हापुरात पोहोचले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी गेले सहा महिने विरोधी पक्ष कर्जमाफीसाठी टाहो फोडत असताना सरकार मात्र गप्पच आहे. सरकारला सुबुद्धी देऊन शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी आज, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता अंबाबाईला साकडे घालण्यात येणार आहे.