शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

खासगी कंपनीकडून ‘स्ट्रक्चलर आॅडिट’

By admin | Updated: August 25, 2016 00:41 IST

‘शिवाजी’सह चार पुलांचा समावेश : राज्यातील १५ पुलांची होणार तपासणी

प्रवीण देसाई -- कोल्हापूर --ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पुलांचे ‘स्ट्रक्चलर आॅडिट’ करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पुलासह राज्यातील १५ पुलांची तपासणी होणार आहे. ही कंपनी पावसाळ्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.महाड (जि. रायगड) येथील ब्रिटिशकालीन पुल ३ आॅगस्टला वाहून गेल्यानंतर जीवित आणि वित्तहानी झाली. याप्रकारामुळे राज्य सरकारला विरोधकांसह जनतेच्या रोषास सामारे जावे लागले. यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चलर आॅडिट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील पन्नाशी पार केलेल्या सर्वच पुलांचे आॅडिट पावसाळ्यानंतर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पूलही याला अपवाद नाहीत. या पुलांवर नियंत्रण असलेल्या केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ऐतिहासिक म्हणजे ब्रिटिशकालीन पुलांचे आॅडिट केले जाणार आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये हे आॅडिट करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. नियुक्ती करण्यात आलेली ही कंपनी सरकारच्या पॅनेलवरील आहे. या कंपनीच्या तज्ज्ञांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पुलासह शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, वारुळ व करंजोशी यांसह राज्यातील १५ ब्रिटिशकालीन पुलांची तपासणी केली जाईल. हे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू होईल.ही कंपनी पुलांची पाहणी करणार असून, यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उपायही सुचवून ते करण्याबाबतचा अहवाल तत्काळ केंद्र सरकारला सादर करणार आहे. याची प्रत संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही दिली जाणार आहे. शिवाजी पुलासह जिल्ह्यातील चार पुलांची तपासणी करण्यासाठी महिन्याभरानंतर ही कंपनी कोल्हापुरात येणार आहे. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह जिल्ह्यातील अन्य चार पुलांचे महिन्याभरानंतर स्ट्रक्चलर आॅडिट होणार आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीकडून ते केले जाईल.- आर. के.बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,