शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

शेतकऱ्यांचा अवमान : इचलकरंजी काँग्रेसच्यावतीने निदर्शने

इचलकरंजी : प्रेम प्रकरणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचा अवमान झाला आहे. दुष्काळ आणि कर्ज अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, अशी टीका माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कौटुंबिक वाद, प्रेम प्रकरणे, व्यसनाधीनता यातून होत असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्या त्यांच्या वक्तव्याबद्दल येथील शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने जनता चौकामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कृषिमंत्र्यांच्या नावाने शंखध्वनी करीत जोरदार निदर्शने झाली. आंदोलनामध्ये शेतकरी बैलगाडी आणि वैरण घेऊन जाणारा शेतकरी सहभागी झाले होते.या आंदोलनामध्ये शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष विलास गाताडे, राहुल खंजिरे, संपत जामदार, शिवाजी काळे, इलाई कलावंत, नंदू पाटील, आर.के.पाटील, राजू बोंद्रे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, अमृत भोसले, समीर शिरगावे, बाळासाहेब माने, शेखर हळदकर, आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)राज्यसभेत अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रेम प्रकरणातून, दारूच्या व्यसनातून, कौटुंबिक वादातून होत असल्याचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. त्यांनी केलेल्या विधानाचा आम्ही धिक्कार करीत आहोत. याचबरोबर या आत्महत्या आज शेतीला भाव मिळत नाही. याचबरोबर कर्जप्रकरण, नैसर्गिक आपत्ती, गारपीट, दुष्काळ यांतून होत आहेत. याचबरोबर एक हजार आत्महत्येच्या प्रकरणांत एखाद्या शेतकऱ्याची प्रेमप्रकरणातूनही आत्महत्या होऊ शकते. मात्र, सरसकट सर्वांच्या आत्महत्या या प्रेमप्रकरण, व्यसनांतून होत असल्याचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. - खासदार राजू शेट्टी 3पाऊस नाही, पिके धोक्यात आली आहेत. साखरेचे दर खाली आले आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रेम आणि व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे विधान करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. भाजपच्या मंत्रिमंडळात राधामोहनसिंह यांच्यासारखे असे अनेक मंत्री आहेत, ज्यांना शेतकरी, गरीब जनता आणि मागासवर्गीय यांच्या प्रश्नांबाबत काहीही देणे-घेणे नाही. पंतप्रधान मोदीही याला अपवाद नाहीत. वादग्रस्त विधाने करून देशामध्ये अराजक माजविण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. - पी. एन. पाटील - माजी आमदार भाजपच्या नेत्यांची डोकी फिरलीत की काय, अशी शंका या नेत्यांच्या विधानावरून येते. हजारो शेतकऱ्यांच्या व शहरातील लोकांच्या मतांच्या जोरावर निवडून आलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांबद्दल असूया आहे. त्यामुळेच ते असे बेताल वक्तव्य करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांना देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांबद्दल अशी विधाने करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचा तीव्र निषेध केला पाहिजे. राधामोहन सिंह यांनी राजीनामा द्यावा. - आमदार हसन मुश्रीफकेंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी आपल्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकण्यासाठी शेतकरी प्रेमप्रकरण, दारूचे व्यसन, कौटुंबिक वाद यांतून आत्महत्या करीत असल्याचा जावईशोध लावला आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आणि अडचणींचा विसर पडला आहे. राज्यसभेत अशी चुकीची उत्तरे देऊन त्यांनी कमालच केली आहे. सरकार आणि त्यात काम करणारे असे मंत्री आपल्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकण्यासाठी अशी कमाल करणारी वक्तव्ये करीत आहेत. एकूणच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनाहीन झालेय. - रघुनाथदादा पाटील५शेतकऱ्याला सध्याची शेती कसणे विविध कारणांमुळे अशक्य आहे. त्यात भर म्हणजे निसर्गाची अवकृपा. या सर्वांचा परिणाम कर्जबाजारीपणा, कौटुंबिक व सामाजिक पातळीवरील मानहानी, भविष्याबद्दलच्या प्रचंड तणावामुळे शेतकरी आत्महत्या करतात हे वास्तव आहे. अशा स्थितीत कौटुंबिक वाद, प्रेमप्रकरण ही कारणे सांगणे कल्पनारंजित वाटते. - प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञशेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या जिव्हाळ्याच्या आणि जीवन-मरणाच्या प्रश्नावर अशा स्वरूपातील केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भूमिका आणि त्यांचे आकलन त्यांना लखलाभ असो. अशा पद्धतीचे बालिश आकलन असणाऱ्यांवर मी फारसे भाष्य करू इच्छित नाही.- प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत