शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री

By admin | Updated: June 29, 2016 01:02 IST

सलग दुसऱ्या दिवशीही संततधार : उसासह सर्वच पिकांना जीवदान; शेतकरी सुखावला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाने दमदार एंट्री घेतली असून दिवसभर संततधार सुरू होती. सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाची संततधार होती. गेले तीन दिवस वातावरणात कमालीचा गारठा असून, या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, चंदगड, आजरा तालुक्यांसह उर्वरित तालुक्यांतही दमदार पाऊस सुरू असून असून, नद्यांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहेआजऱ्यात पावसाची संततधारआजरा : आजरा शहरासह तालुक्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू असून, सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. चित्री प्रकल्पक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. सलग दोन दिवस पावसामुळे ऊस व भात पिकांसह सोयाबीन पिकालाही जीवदान मिळणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास भात रोप लावणीची कामे येत्या चार दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. एकंदर पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गासह सामान्य माणूस सुखावला आहे. भादोले परिसरात पाऊसभादोले : भादोले परिसरात मंगळवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गेले तीन दिवस वातावरणात कमालीचा गारठा असून, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.तालुक्यात यंदा वळीव आणि मान्सूनच्या पावसानेही कमी प्रमाणात हजेरी लावली. वळीव पाऊस मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात पडला. त्यानंतर मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली नाही. मंगळवारी सकाळपासून भादोले परिसरात हलक्या सरी बरसल्या. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कागलमध्येही रिपरिपम्हाकवे : कागल तालुक्यात सोमवारी पावसाने दमदार एंट्री करत सरासरी १४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक बिद्री मंडलमध्ये २८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सिद्धनेर्ली मंडलमध्ये सर्वांत कमी ०६ मि.मी. पाऊस झाला. या महिनाभरात अत्यल्प म्हणजेच १०८ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात २२० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तालुक्यामध्ये कमीत कमी ६५० मि.मी. इतका पाऊस अपेक्षित असल्याने आगामी दोन महिन्यांत जोरदार पावसाची गरज आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात वळवाच्या हजेरीमुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग, आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर चार-आठ दिवसांनी हलक्या स्वरूपात झालेल्या पावसामुळे या पिकांची उगवण झाली आहे. त्यामुळे या पिकांसह उसाला पावसाची नितांत गरज होती. मंगळवारीही पावसाची दिवसभर रिपरिप सुरूच होती. दरम्यान, सोमवारी दिवसभर मुरगूड मंडलमध्ये १५ मि.मी., कागल ११ मि.मी., केनवडे १६, सेनापती कापशी १०, खडकेवाडा ०८ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.धामणी खोऱ्यात दमदार पाऊसम्हासुर्ली : लांबलेल्या मान्सूनने गेल्या दोन दिवसांपासून धामणी खोऱ्यात दमदार सुरुवात केल्याने बळिराजा सुखावला आहे. सात महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर या खोऱ्याची जीवनदायीनी धामणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरून वाहणारी ही जिल्ह्यातील पहिलीच नदी आहे. गेल्या चार महिन्यांपासून बंद असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता असून, तीव्र पाणीटंचाईवर काहीसा दिलासा मिळणार आहे.