शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री

By admin | Updated: June 29, 2016 01:02 IST

सलग दुसऱ्या दिवशीही संततधार : उसासह सर्वच पिकांना जीवदान; शेतकरी सुखावला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाने दमदार एंट्री घेतली असून दिवसभर संततधार सुरू होती. सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाची संततधार होती. गेले तीन दिवस वातावरणात कमालीचा गारठा असून, या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, चंदगड, आजरा तालुक्यांसह उर्वरित तालुक्यांतही दमदार पाऊस सुरू असून असून, नद्यांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहेआजऱ्यात पावसाची संततधारआजरा : आजरा शहरासह तालुक्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू असून, सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. चित्री प्रकल्पक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. सलग दोन दिवस पावसामुळे ऊस व भात पिकांसह सोयाबीन पिकालाही जीवदान मिळणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास भात रोप लावणीची कामे येत्या चार दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. एकंदर पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गासह सामान्य माणूस सुखावला आहे. भादोले परिसरात पाऊसभादोले : भादोले परिसरात मंगळवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गेले तीन दिवस वातावरणात कमालीचा गारठा असून, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.तालुक्यात यंदा वळीव आणि मान्सूनच्या पावसानेही कमी प्रमाणात हजेरी लावली. वळीव पाऊस मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात पडला. त्यानंतर मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली नाही. मंगळवारी सकाळपासून भादोले परिसरात हलक्या सरी बरसल्या. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कागलमध्येही रिपरिपम्हाकवे : कागल तालुक्यात सोमवारी पावसाने दमदार एंट्री करत सरासरी १४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक बिद्री मंडलमध्ये २८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सिद्धनेर्ली मंडलमध्ये सर्वांत कमी ०६ मि.मी. पाऊस झाला. या महिनाभरात अत्यल्प म्हणजेच १०८ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात २२० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तालुक्यामध्ये कमीत कमी ६५० मि.मी. इतका पाऊस अपेक्षित असल्याने आगामी दोन महिन्यांत जोरदार पावसाची गरज आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात वळवाच्या हजेरीमुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग, आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर चार-आठ दिवसांनी हलक्या स्वरूपात झालेल्या पावसामुळे या पिकांची उगवण झाली आहे. त्यामुळे या पिकांसह उसाला पावसाची नितांत गरज होती. मंगळवारीही पावसाची दिवसभर रिपरिप सुरूच होती. दरम्यान, सोमवारी दिवसभर मुरगूड मंडलमध्ये १५ मि.मी., कागल ११ मि.मी., केनवडे १६, सेनापती कापशी १०, खडकेवाडा ०८ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.धामणी खोऱ्यात दमदार पाऊसम्हासुर्ली : लांबलेल्या मान्सूनने गेल्या दोन दिवसांपासून धामणी खोऱ्यात दमदार सुरुवात केल्याने बळिराजा सुखावला आहे. सात महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर या खोऱ्याची जीवनदायीनी धामणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरून वाहणारी ही जिल्ह्यातील पहिलीच नदी आहे. गेल्या चार महिन्यांपासून बंद असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता असून, तीव्र पाणीटंचाईवर काहीसा दिलासा मिळणार आहे.