शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रंकाळ्यासाठी जुजबी प्रयत्न

By admin | Updated: December 26, 2014 00:06 IST

जलपर्णीचा पुन्हा धोका : ५० टक्के ड्रेनेजलाईन बंदच; सांडपाण्यामुळे अवकळा

कोल्हापूर : रंकाळ्यात मिसळणाऱ्या शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाला, आदी ठिकाणांच्या मिळून तब्बल ११ ते १२ एमएलडी (दशलक्ष लिटर) मैलामिश्रित सांडपाण्यापैकी तब्बल १० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरल्यानेच पुन्हा रंकाळ्याला जलपर्णीचा धोका सतावू लागला आहे. रंकाळा तलावात अद्याप ५० टक्के सांडपाणी मिसळत आहे. यावर तातडीचे उपाय म्हणून महापालिकेने काल, बुधवारपासून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे. महापालिकेच्या गलथानपणामुळेच रंंकाळा अखेरची घटका मोजत आहे. रंकाळाप्रेमींतून याबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून मिळालेल्या आठ कोटी निधीपैकी सव्वासहा कोटी रुपये खर्चून रंकाळा ते दुधाळी नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. गेली साडेचार वर्षे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे रंकाळ्याचे दुखणे वाढतच गेले. पाईपलाईनमध्ये खरमाती अडकल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी रंकाळ्यात मिसळू लागले. सांडपाण्याचे दृश्य स्वरूपातील परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.रंकाळ्यात सरनाईक कॉलनीतून मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. या पाण्याची मोठी दुर्गंधी सुटली आहे. याठिकाणी जलपर्णी वाढून हे पाणी आता रंकाळ्यात मिसळण्यास सुरुवात झाली आहे. आता जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केंदाळ व जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरू असलेल्या या जुजबी प्रयत्नांवरच प्रशासनाची भिस्त असल्याने रंकाळा तलावाला पुन्हा मोठा फटका बसू शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. (प्रतिनिधी)