शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

संपाची कोंडी कायम

By admin | Updated: August 5, 2015 00:39 IST

सायझिंग कामगारांचा संप : कृती समितीचे प्रतिनिधी अनुपस्थित

इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाबाबत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी आयोजित बैठकीसाठी सायझिंगधारक कृती समितीचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले. त्यामुळे कामगार संघटनेने किमान वेतन राबविण्याची जबाबदारी प्रशासनावर टाकली, तर दुपारी कृती समितीच्या प्रतिनिधींनी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना भेटून न्यायप्रविष्ट किमान वेतनाबाबत आणि कामगार संघटनेच्या नेतृत्वाबरोबर चर्चा करणार नसल्याची भूमिका विषद केली. परिणामी गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या संपाची कोंडी कायम राहिली आहे.शासनाने जाहीर केलेल्या यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब करावी, यासाठी लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने १४ जुलैपासून बेमुदत संप सुरू केला आहे. संपाचा परिणाम आता यंत्रमाग कारखान्यांवर होऊ लागला असून, यंत्रमाग कापडाचे साठ टक्के उत्पादन ठप्प झाले. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी जिरंगे यांनी, कामगार संघटना व सायझिंगधारक कृती समिती यांची मंगळवारी सायंकाळी बोलावली होती. बैठकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कृती समितीचे एक शिष्टमंडळ प्रांताधिकारी जिरंगे यांना भेटले. चर्चेमध्ये किमान वेतनाबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून या न्यायप्रविष्ट विषयावर आम्हाला काही बोलता येणार नाही, असे कृती समितीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कामगार संघटनेच्या हेकेखोर नेतृत्वाबरोबर आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही. शिष्टमंडळामध्ये संतोष कोळी, प्रकाश गौड, वसंत पाटील, दिलीप ढोकळे, अनिल मगदूम, बंडोपंत लाड, आदींचा समावेश होता.दरम्यान, सायंकाळी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये उच्च न्यायालयाने किमान वेतनाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिलेली नाही आणि शासनानेच जाहीर केलेले किमान वेतन असल्याने ते राबविणे हे प्रशासनाचे काम आहे, असे कामगार संघटनेने सांगितले. शिष्टमंडळामध्ये कामगार नेते ए. बी. पाटील, सुभाष निकम, आनंदराव चव्हाण, कुलकर्णी, आदींचा समावेश होता. बैठकीसाठी उपअधीक्षक विनायक नराळे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.कामगार संघटना व सायझिंगधारक कृती समितींनी परस्परविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि चर्चेसाठी बसणार नसल्याचे जाहीर केल्याने कोंडी कायम राहिली.