शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोल्हापुरात दोन दिवसात कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून देशाच्या तुलनेत येथे मृत्यूदरही जास्त आहे. आता कडक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून देशाच्या तुलनेत येथे मृत्यूदरही जास्त आहे. आता कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नसून आमच्याकडील सर्व साधन सामुग्री संपल्याने येत्या दोन दिवसात जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केले जाईल. यामध्ये दूध व मेडिकल सोडून सगळे व्यवहार किमान चौदा दिवस पूर्णपणे बंद राहतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यातही गेल्या सात-आठ दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यावरच आताच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. विशेष म्हणजे पहिल्या लाटेपेक्षा विषाणूची ताकद अधिक आहे. त्याचा फैलाव लगेच होऊन दोन-तीन दिवसातच रुग्ण अत्यवस्थ होतो. ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तरुण मुले मृत्युमुखी पडत आहेत. एकूणच परिस्थिती चिंताजनक असून पालकमंत्री सतेज पाटील आज मंगळवारी आल्यानंतर दहा की चौदा दिवसांच्या लॉकडाऊनवर अंतिम निर्णय घेतला जाईल. दूध व मेडिकल सोडून कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘गोकुळ’ निवडणुकीनंतर लॉकडाऊन गरजेचा होता

‘गोकुळ’ची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कडक लॉकडाऊनची तयारी आम्ही केली होती. सोशल मीडियातून त्यावर उलटसुलट चर्चा झाल्यानंतर निर्णय मागेे घेतला; मात्र त्यावेळी लॉकडाऊन केले असते तर आज परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असती. टीकेकडे लक्ष न देता, निर्णय घेणे अपेक्षित होते, मी कागलमध्ये कडक लॉकडाऊन टाकल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टास्क फोर्स आज कोल्हापुरात

बाहेरील जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत, ते वेळेत येत नसल्याने त्यातून मृत्यू वाढत आहेत. तरीही त्याचा अभ्यास करण्यासाठी

तातडीने टास्क फोर्स पाठवण्याबाबत विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याशी बोललो आहे. आज, टास्क फाेर्स येत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका

महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले. त्याबाबतही आपली तयारी सुरू असून लहान मुलांसाठी व्हेंटिलेटरसह इतर तयारी करण्याची सूचना दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

औषध पुरवठ्यासाठी राजेश टोपेंशी संपर्क

जिल्ह्याला रेमडेसिविर, ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरेसा पुरवठा करावा, यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.