शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना उपाशी ठेवणारी ‘कडक’ आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:26 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या अतिरेकी आचारसंहितेमुळे हजारो प्रवाशांवर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. कोल्हापुरात उशिरा येणाऱ्यांना अन्नासाठी अक्षरश: विनवणी करण्याची पाळी आली असून, केवळ कोल्हापूर, सांगलीतच ही बंधने का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या तीन हॉटेलमालकांनी या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.जमावबंदीचे १४४ कलम लावून कोल्हापूर आणि सांगली शहरांतील हॉटेल्स साडेदहानंतर बंद करावीत, असे तुघलकी फर्मान जिल्हा प्रशासनाने काढले आहे. या फर्मानाचा परिणाम काय होणार याचा विचार न करता याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.परंतु हा फटका केवळ हॉटेल व्यावसायिकांना बसला नाही; तर मुंबई, पुण्याहून येणाºया प्रवाशांनाही त्याचा रोज फटका बसत आहे. रात्री दहानंतर कोल्हापुरात आल्यानंतर या मंडळींना खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्टॅँडजवळचे गाडे बंद केले जातात. हॉटेल्स साडेदहाला बंद केली जातात. त्यामुळे कांदेपोहे खाऊन तरी पोट भरावं म्हटलं तरी तेही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अक्षरश: छोटी मुलं बरोबर असणारे पालक हॉटेलवाल्यांना विनवणी करताना दिसत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जेव्हा हॉटेलचालकांनी या नियमाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली तेव्हा मग साडेदहापूर्वी तुमच्या हॉटेलमध्ये जे ग्राहक येतील त्यांना सेवा देण्यास हरकत नाही; पण साडेदहाला शटर बंद करायचे असे सांगण्यात आले.कंपाऊंडच्या आतील जबाबदारी हॉटेलमालकांचीहॉटेलसाठी परवाना देतानाच कंपाऊंडच्या आत जे काही होईल त्याची जबाबदारी हॉटेलमालकावर टाकण्यात आली आहे. असे असताना ही जबाबदारी मालक घेत असताना पुन्हा प्रशासनाने आचारसंहितेच्या नावाखाली नागरिकांना उपाशी ठेवणारा आदेश का काढला, अशी विचारणा केली जात आहे. तुम्ही बार एकवेळ बंद ठेवा; परंतु लोकांच्या पोटावर मारू नका, असे आवाहन प्रशासनाला हॉटेलमालकांकडून करण्यात येत आहे.मोफत जेवणाची सोयजर प्रशासन या पद्धतीनेच मनमानी करीत असेल तर किमान रात्री एस. टी. स्टॅँडवर येणाºया प्रवाशांच्या जेवणाची तरी मोफत सोय प्रशासनाने करावी, अशीही मागणी या निमित्ताने केली जात आहे.तीन हॉटेल्समालक न्यायालयातकोल्हापुरातील सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, आशिष रायबागे हे तिघे हॉटेलमालक या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत.