शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना उपाशी ठेवणारी ‘कडक’ आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:26 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या अतिरेकी आचारसंहितेमुळे हजारो प्रवाशांवर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. कोल्हापुरात उशिरा येणाऱ्यांना अन्नासाठी अक्षरश: विनवणी करण्याची पाळी आली असून, केवळ कोल्हापूर, सांगलीतच ही बंधने का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या तीन हॉटेलमालकांनी या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.जमावबंदीचे १४४ कलम लावून कोल्हापूर आणि सांगली शहरांतील हॉटेल्स साडेदहानंतर बंद करावीत, असे तुघलकी फर्मान जिल्हा प्रशासनाने काढले आहे. या फर्मानाचा परिणाम काय होणार याचा विचार न करता याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.परंतु हा फटका केवळ हॉटेल व्यावसायिकांना बसला नाही; तर मुंबई, पुण्याहून येणाºया प्रवाशांनाही त्याचा रोज फटका बसत आहे. रात्री दहानंतर कोल्हापुरात आल्यानंतर या मंडळींना खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्टॅँडजवळचे गाडे बंद केले जातात. हॉटेल्स साडेदहाला बंद केली जातात. त्यामुळे कांदेपोहे खाऊन तरी पोट भरावं म्हटलं तरी तेही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अक्षरश: छोटी मुलं बरोबर असणारे पालक हॉटेलवाल्यांना विनवणी करताना दिसत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जेव्हा हॉटेलचालकांनी या नियमाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली तेव्हा मग साडेदहापूर्वी तुमच्या हॉटेलमध्ये जे ग्राहक येतील त्यांना सेवा देण्यास हरकत नाही; पण साडेदहाला शटर बंद करायचे असे सांगण्यात आले.कंपाऊंडच्या आतील जबाबदारी हॉटेलमालकांचीहॉटेलसाठी परवाना देतानाच कंपाऊंडच्या आत जे काही होईल त्याची जबाबदारी हॉटेलमालकावर टाकण्यात आली आहे. असे असताना ही जबाबदारी मालक घेत असताना पुन्हा प्रशासनाने आचारसंहितेच्या नावाखाली नागरिकांना उपाशी ठेवणारा आदेश का काढला, अशी विचारणा केली जात आहे. तुम्ही बार एकवेळ बंद ठेवा; परंतु लोकांच्या पोटावर मारू नका, असे आवाहन प्रशासनाला हॉटेलमालकांकडून करण्यात येत आहे.मोफत जेवणाची सोयजर प्रशासन या पद्धतीनेच मनमानी करीत असेल तर किमान रात्री एस. टी. स्टॅँडवर येणाºया प्रवाशांच्या जेवणाची तरी मोफत सोय प्रशासनाने करावी, अशीही मागणी या निमित्ताने केली जात आहे.तीन हॉटेल्समालक न्यायालयातकोल्हापुरातील सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, आशिष रायबागे हे तिघे हॉटेलमालक या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत.