शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

पर्यटकांना उपाशी ठेवणारी ‘कडक’ आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:26 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या अतिरेकी आचारसंहितेमुळे हजारो प्रवाशांवर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. कोल्हापुरात उशिरा येणाऱ्यांना अन्नासाठी अक्षरश: विनवणी करण्याची पाळी आली असून, केवळ कोल्हापूर, सांगलीतच ही बंधने का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या तीन हॉटेलमालकांनी या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.जमावबंदीचे १४४ कलम लावून कोल्हापूर आणि सांगली शहरांतील हॉटेल्स साडेदहानंतर बंद करावीत, असे तुघलकी फर्मान जिल्हा प्रशासनाने काढले आहे. या फर्मानाचा परिणाम काय होणार याचा विचार न करता याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.परंतु हा फटका केवळ हॉटेल व्यावसायिकांना बसला नाही; तर मुंबई, पुण्याहून येणाºया प्रवाशांनाही त्याचा रोज फटका बसत आहे. रात्री दहानंतर कोल्हापुरात आल्यानंतर या मंडळींना खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्टॅँडजवळचे गाडे बंद केले जातात. हॉटेल्स साडेदहाला बंद केली जातात. त्यामुळे कांदेपोहे खाऊन तरी पोट भरावं म्हटलं तरी तेही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अक्षरश: छोटी मुलं बरोबर असणारे पालक हॉटेलवाल्यांना विनवणी करताना दिसत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जेव्हा हॉटेलचालकांनी या नियमाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली तेव्हा मग साडेदहापूर्वी तुमच्या हॉटेलमध्ये जे ग्राहक येतील त्यांना सेवा देण्यास हरकत नाही; पण साडेदहाला शटर बंद करायचे असे सांगण्यात आले.कंपाऊंडच्या आतील जबाबदारी हॉटेलमालकांचीहॉटेलसाठी परवाना देतानाच कंपाऊंडच्या आत जे काही होईल त्याची जबाबदारी हॉटेलमालकावर टाकण्यात आली आहे. असे असताना ही जबाबदारी मालक घेत असताना पुन्हा प्रशासनाने आचारसंहितेच्या नावाखाली नागरिकांना उपाशी ठेवणारा आदेश का काढला, अशी विचारणा केली जात आहे. तुम्ही बार एकवेळ बंद ठेवा; परंतु लोकांच्या पोटावर मारू नका, असे आवाहन प्रशासनाला हॉटेलमालकांकडून करण्यात येत आहे.मोफत जेवणाची सोयजर प्रशासन या पद्धतीनेच मनमानी करीत असेल तर किमान रात्री एस. टी. स्टॅँडवर येणाºया प्रवाशांच्या जेवणाची तरी मोफत सोय प्रशासनाने करावी, अशीही मागणी या निमित्ताने केली जात आहे.तीन हॉटेल्समालक न्यायालयातकोल्हापुरातील सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, आशिष रायबागे हे तिघे हॉटेलमालक या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत.