शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे मराठा आरक्षणाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:36 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याबरोबरच त्या चळवळीला अभ्यासात्मक ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याबरोबरच त्या चळवळीला अभ्यासात्मक बळ देण्यातही कोल्हापूरचा वाटा मोठा राहिला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे तर शासनाने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्षच होते. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केलेल्या तारखेला होऊ शकला.कोल्हापूरने एकदा मनावर घेतले की मग तो कोणताही विषय असो; त्याची तड लावल्याशिवाय कोल्हापुरी माणूस थांबत नाही. त्याचे प्रत्यंतर म्हणजे कोल्हापुरातील टोललढा. त्यानंतर कोल्हापूरने मराठा आरक्षण चळवळीत तितक्याच नेटाने भाग घेतला. मराठा आरक्षण मागणीसाठी १६ आॅक्टोबर २०१६ ला निघालेला मोर्चाही महाराष्ट्रातील त्यापूर्वीच्या मोर्चाचे उच्चांक मोडणारा होता. त्यानंतर मुंबईत ९ आॅगस्ट २०१७ ला निघालेल्या मोर्चातही कोल्हापूरचा सहभाग मोठा राहिला. मोर्चे निघाले; परंतु आरक्षणाचा निर्णय होत नव्हता म्हणून राज्यभरातून ठिय्या आंदोलने सुरू झाली. त्याची सुरुवात पाथर्डी (जि. अहमदनगर) येथून झाली; परंतु त्याचा शेवट मात्र कोल्हापूरने केला. कोल्हापूरने अत्यंत नेटाने हे आंदोलन तब्बल ४२ दिवस चालविले. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी नियुक्त केलेल्या उपसमितीला त्यासाठी कोल्हापुरात यावे लागले. या समितीला शाहू जन्मस्थळी येऊन आम्ही आरक्षणाचा निर्णय ३० नोव्हेंबरपूर्वी घेतो, असे लिहून द्यावे लागले; मगच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. एवढे झाल्यानंतरही कोल्हापुरातील मराठा मावळे शांत बसले नाहीत. त्यांनी २६ नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर गाडी मोर्चा काढण्याचे नियोजन केले. त्याचाही धसका सरकारने घेतला; कारण सरकारला हे माहीत होते की, कोल्हापुरात एकदा वात लागली तर पुन्हा राज्यभर आंदोलन पेटेल. तोंडावर लोकसभेच्या निवडणुका आहेत, ते सत्तारूढ भाजप-शिवसेनेला परवडणारे नव्हते. अगोदरच भाजप सरकारबद्दल, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नकारात्मक चित्र तयार होऊ लागले आहे. अशा स्थितीत हा विषय पेटला तर राजकीयदृष्ट्या अडचणी वाढतील. म्हणून गाडी मोर्चा निघणार नाही यासाठीही सरकारने पोलिसी बळाचा वापर केला. हा आंदोलनाचा सातत्यपूर्ण रेटाच आरक्षण मिळवून देण्यास कारणीभूत ठरला आहे.चळवळीच्या पातळीवर ही संघटनात्मक ताकद पणाला लावली असतानाच आरक्षण देणे कसे आवश्यक आहे, हे अभ्यासाच्या पातळीवरही कोल्हापूरने पटवून दिले. मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या ‘नारायण राणे समिती’ला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ड्राफ्ट करून देण्यात मदत केली होती. भाजप सरकारने नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाचे विधि सल्लागार म्हणून कसबा बावडा येथील माजी न्यायाधीश के. डी. पाटील यांनी काम पाहिले. त्याअगोदर ‘बार्टी’ संस्थेने मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या समितीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, पुराभिलेखागार विभागाचे सहायक संचालक गणेश खोडके, पुण्याचे सहायक संचालक परंतु मूळचे भुदरगड तालुक्यातील सर्जेराव वाडकर यांचाही वाटा महत्त्वाचा राहिला.पुन्हा शाहूंचे द्रष्टेपणच उपयोगीमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध होणे फारच महत्त्वाचे होते; कारण त्याशिवाय आरक्षणाची मागणीच करता येत नव्हती. तो आरक्षणाचा पायाच होता. हे सिद्ध करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या काळातील कागदपत्रांची फार मोलाची मदत झाली आहे. ही सर्व कागदपत्रे कोल्हापूर पुराभिलेखागार विभागाने उपलब्ध करून दिली आहेत. त्याची नोंद मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरील अनुपालन अहवालातही घेतली आहे. ‘आरक्षणाचे जनक’ अशी ओळख असलेल्या राजर्षी शाहूंच्या या कार्याचे तब्बल शंभर वर्षांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात योगदान राहिले. त्यातून शाहू महाराजांचे द्रष्टेपणच पुन्हा अधोरेखित झाले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील केंद्रस्थानीकोल्हापूरचे पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे आरक्षण मिळवून देण्यात सरकारच्या बाजूने ज्या घडामोडी झाल्या, त्याच्या सुरुवातीपासूनच केंद्रस्थानी राहिले. शासनाने त्यासाठी नियुक्त केलेल्या उपसमितीचे ते अध्यक्षच होते; परंतु स्वत: पाटील हे मराठा समाजातील असल्याने सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याचे अधिकार त्यांनाच दिले होते. त्यामुळे अत्यंत संवेदनशील स्थितीतही त्यांनी हा विषय कौशल्याने हाताळला. मंत्री पाटील अगदी सुरुवातीपासूनच ‘आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार’, असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगत होते. तो विश्वास त्यांनी खरा करून दाखविला.