शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामित्वासाठी ‘शेकाप’ बळकट करा

By admin | Updated: February 14, 2016 00:56 IST

जयंत पाटील : कार्यकर्त्यांचा मेळावा; जातीयवादी पक्षांकडून गोरगरिबांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : धार्मिकता व जातीयवादी पक्षांनी सत्ता हातात घेऊन गोरगरीब व श्रमजीवींना उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे डाव्या विचारांच्या पक्षांची आवश्यकता भासत असून यासाठी शेतकरी कामगार पक्ष बळकट झाला पाहिजे, असे प्रतिपादन पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केले. टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. आमदार जयंत पाटील म्हणाले, महागाईचा उच्चांक गाठला जात आहे. तसेच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या सरकारकडून धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. याच विषयांवर वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रे होत आहेत. म्हणून गोरगरीब, कष्टकरी व श्रमजीवींचे प्रश्न सोडविण्यासाठी डाव्यांशिवाय कुणीच नाही. ते पुढे म्हणाले, हे सरकार आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्या करुणेची प्रसिद्धी करून शेतकऱ्यांना बदनाम करीत आहे. दुष्काळी मराठवाड्यात शेकापक्षाने स्वखर्चाने चार कोटी खर्च करून कालवा तयार केला आहे. एक हजार शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली. मराठवाडा विद्यापीठातील एक हजार विद्यार्थ्यांना दररोज जेवण दिले जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फक्त आर्थिकच नव्हे तर इतर छोटे-छोटे व्यवसाय पक्षाने उभारून दिले आहेत; पण याची कुठेही जाहिरात वा बातमी करून शेकापने शेतकऱ्यांच्या दुर्दैवी गरिबीचे प्रदर्शन केले नाही. भाजप सरकारने बाजार समितीला पर्याय म्हणून खासगी मार्केट उभारण्याचा निर्णय घेऊन समितीचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतीमालाचा दर खासगी मार्केटवाल्या अडत्यांच्या मनावरच ठरणार आहे. शासनाच्या या जनताविरोधी कृत्यांवर शेका पक्षानेच आवाज उठविला पाहिजे. संपतराव पवार-पाटील म्हणाले, शासनाचे जनताविरोधी निर्णय लोकांपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांनी पोहोचवून त्यांची फसवाफसवी समोर आणावी. अजित देसाई, डॉ. संपत पाटील, अंबाजी पाटील, पी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील, शिवाजीराव साळुंखे, नारायण जाधव, पांडुरंग पाटील, संतराम पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत बागडी, रवी पाटील, शरद नलवडे, आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी स्वागत केले. जनार्दन जाधव यांनी आभार मानले. यावेळी भारत पाटील, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, अशोकराव पवार-पाटील, केरबा पाटील, एकनाथ पाटील, विश्वास वरुटे, डी. पी. कांबळे, संभाजी पाटील, अमित कांबळे, सरदार पाटील, मोहन पाटील, अस्लम बागवान, मेहजबीन शेख, समर पवार-पाटील, दत्ता पाटील, डॉ. सुभाष पाटील, आदी उपस्थित होते.