शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पुरोगामित्वासाठी ‘शेकाप’ बळकट करा

By admin | Updated: February 14, 2016 00:56 IST

जयंत पाटील : कार्यकर्त्यांचा मेळावा; जातीयवादी पक्षांकडून गोरगरिबांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : धार्मिकता व जातीयवादी पक्षांनी सत्ता हातात घेऊन गोरगरीब व श्रमजीवींना उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे डाव्या विचारांच्या पक्षांची आवश्यकता भासत असून यासाठी शेतकरी कामगार पक्ष बळकट झाला पाहिजे, असे प्रतिपादन पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केले. टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. आमदार जयंत पाटील म्हणाले, महागाईचा उच्चांक गाठला जात आहे. तसेच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या सरकारकडून धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. याच विषयांवर वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रे होत आहेत. म्हणून गोरगरीब, कष्टकरी व श्रमजीवींचे प्रश्न सोडविण्यासाठी डाव्यांशिवाय कुणीच नाही. ते पुढे म्हणाले, हे सरकार आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्या करुणेची प्रसिद्धी करून शेतकऱ्यांना बदनाम करीत आहे. दुष्काळी मराठवाड्यात शेकापक्षाने स्वखर्चाने चार कोटी खर्च करून कालवा तयार केला आहे. एक हजार शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली. मराठवाडा विद्यापीठातील एक हजार विद्यार्थ्यांना दररोज जेवण दिले जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फक्त आर्थिकच नव्हे तर इतर छोटे-छोटे व्यवसाय पक्षाने उभारून दिले आहेत; पण याची कुठेही जाहिरात वा बातमी करून शेकापने शेतकऱ्यांच्या दुर्दैवी गरिबीचे प्रदर्शन केले नाही. भाजप सरकारने बाजार समितीला पर्याय म्हणून खासगी मार्केट उभारण्याचा निर्णय घेऊन समितीचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतीमालाचा दर खासगी मार्केटवाल्या अडत्यांच्या मनावरच ठरणार आहे. शासनाच्या या जनताविरोधी कृत्यांवर शेका पक्षानेच आवाज उठविला पाहिजे. संपतराव पवार-पाटील म्हणाले, शासनाचे जनताविरोधी निर्णय लोकांपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांनी पोहोचवून त्यांची फसवाफसवी समोर आणावी. अजित देसाई, डॉ. संपत पाटील, अंबाजी पाटील, पी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील, शिवाजीराव साळुंखे, नारायण जाधव, पांडुरंग पाटील, संतराम पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत बागडी, रवी पाटील, शरद नलवडे, आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी स्वागत केले. जनार्दन जाधव यांनी आभार मानले. यावेळी भारत पाटील, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, अशोकराव पवार-पाटील, केरबा पाटील, एकनाथ पाटील, विश्वास वरुटे, डी. पी. कांबळे, संभाजी पाटील, अमित कांबळे, सरदार पाटील, मोहन पाटील, अस्लम बागवान, मेहजबीन शेख, समर पवार-पाटील, दत्ता पाटील, डॉ. सुभाष पाटील, आदी उपस्थित होते.