शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

पुरोगामित्वासाठी ‘शेकाप’ बळकट करा

By admin | Updated: February 14, 2016 00:56 IST

जयंत पाटील : कार्यकर्त्यांचा मेळावा; जातीयवादी पक्षांकडून गोरगरिबांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : धार्मिकता व जातीयवादी पक्षांनी सत्ता हातात घेऊन गोरगरीब व श्रमजीवींना उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे डाव्या विचारांच्या पक्षांची आवश्यकता भासत असून यासाठी शेतकरी कामगार पक्ष बळकट झाला पाहिजे, असे प्रतिपादन पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केले. टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. आमदार जयंत पाटील म्हणाले, महागाईचा उच्चांक गाठला जात आहे. तसेच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या सरकारकडून धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. याच विषयांवर वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रे होत आहेत. म्हणून गोरगरीब, कष्टकरी व श्रमजीवींचे प्रश्न सोडविण्यासाठी डाव्यांशिवाय कुणीच नाही. ते पुढे म्हणाले, हे सरकार आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्या करुणेची प्रसिद्धी करून शेतकऱ्यांना बदनाम करीत आहे. दुष्काळी मराठवाड्यात शेकापक्षाने स्वखर्चाने चार कोटी खर्च करून कालवा तयार केला आहे. एक हजार शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली. मराठवाडा विद्यापीठातील एक हजार विद्यार्थ्यांना दररोज जेवण दिले जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फक्त आर्थिकच नव्हे तर इतर छोटे-छोटे व्यवसाय पक्षाने उभारून दिले आहेत; पण याची कुठेही जाहिरात वा बातमी करून शेकापने शेतकऱ्यांच्या दुर्दैवी गरिबीचे प्रदर्शन केले नाही. भाजप सरकारने बाजार समितीला पर्याय म्हणून खासगी मार्केट उभारण्याचा निर्णय घेऊन समितीचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतीमालाचा दर खासगी मार्केटवाल्या अडत्यांच्या मनावरच ठरणार आहे. शासनाच्या या जनताविरोधी कृत्यांवर शेका पक्षानेच आवाज उठविला पाहिजे. संपतराव पवार-पाटील म्हणाले, शासनाचे जनताविरोधी निर्णय लोकांपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांनी पोहोचवून त्यांची फसवाफसवी समोर आणावी. अजित देसाई, डॉ. संपत पाटील, अंबाजी पाटील, पी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील, शिवाजीराव साळुंखे, नारायण जाधव, पांडुरंग पाटील, संतराम पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत बागडी, रवी पाटील, शरद नलवडे, आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी स्वागत केले. जनार्दन जाधव यांनी आभार मानले. यावेळी भारत पाटील, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, अशोकराव पवार-पाटील, केरबा पाटील, एकनाथ पाटील, विश्वास वरुटे, डी. पी. कांबळे, संभाजी पाटील, अमित कांबळे, सरदार पाटील, मोहन पाटील, अस्लम बागवान, मेहजबीन शेख, समर पवार-पाटील, दत्ता पाटील, डॉ. सुभाष पाटील, आदी उपस्थित होते.