शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

‘एसटीपी’ पूर्ण क्षमतेने सुरू

By admin | Updated: April 22, 2015 00:21 IST

प्रशासनाचा दावा : जयंती नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. जयंती नाल्यातील १०० टक्के दूषित पाण्याचा उपसा करून यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू झाले आहे. शहरातील ६५ टक्के दूषित पाणी थेट नदीत मिळणे बंद होणार आहे. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार येथील नाल्यांतील दूषित पाणी नदीत मिसळते. या पाण्यावर येत्या वर्षभरात प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी (दि.२३) सुनावणी होत आहे. तत्पूर्वी, कोणत्याही परिस्थितीत केंद्र सुरू करून त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे मनपाला गरजेचे आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेणाऱ्या पाईपचे काम पूर्ण होताच, सोमवारी रात्रीपासून जयंती नाल्यातील ५५ ते ६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू केली. ‘राजाराम’सह नऊ प्रोसेसर्सची आज वीज तोडणारकोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना, तसेच इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटना वीजपुरवठा खंडित करण्यासंदर्भात महावितरणने मंगळवारी सकाळी नोटीस लागू केली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे २४ तासांची मुदत संपताच आज, बुधवारी सकाळी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. राजाराम कारखाना व इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटमालकांनी आपले रसायनमिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत सोडल्याचे आढळून आले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी संबंधित संस्थांचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिला आहे.