शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

७५ कोटींचा ‘एसटीपी’ही बिनकामी

By admin | Updated: April 29, 2015 00:25 IST

महापालिकेचा दावा फोल : गेले दोन दिवस जयंती नाल्याचे सांडपाणी थेट पंचगंगेत; नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापूर : कसबा बावडा येथे ७५ कोटी रुपये खर्चून उभारलेले घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कुचकामी ठरत असून, नेहमीप्रमाणे जयंती नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे नदीकाठच्या गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबत न्यायालयाने बॅँक गॅरटी जप्त व महापालिका बरखास्तीच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने ‘एसटीपी’ (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) पूर्ण करून २० एप्रिलपासून एसटीपीमध्ये प्रतिदिन ६० दशलक्ष लिटर (एमएलडी)हून अधिक मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. मात्र, प्रत्यक्षात रात्रीच्यावेळी केंद्र बंद ठेवून नफा कमावला जात आहे. जयंती नाल्यावर पुरेशी दूषित पाणी उपसा यंत्रणा नसल्याने शहरात पडलेल्या हलक्या पावसानेही नाला दोन-दोन दिवस थेट नदीत मिसळत आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे चोवीस तासांत २०० एमएलडीहून अधिक दूषित पाणी थेट नदीत मिसळले. परिणामी नदीकाठावरील गावांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.न्यायालयाच्या कारवाईच्या धास्तीने तातडीने प्रकल्प पूर्ण केल्याचे महापालिकेने दाखविले असले तरी प्रत्यक्षात जयंती नाल्यातून उपसा करण्यात येणाऱ्या सर्व पाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. दिवसा तोंडदेखलेपणासाठी केंद्र सुरू ठेवले जात आहे.(प्रतिनिधी)प्रकल्पाचा नागरिकांना भुर्दंडमहापालिकेने दोन वर्षांपासूनच पाणीपट्टी बिलात १० ते १५ टक्के वाढ केली आहे. सांडपाणी अधिभार सुरू करून हे पैसे संबंधित ठेकेदारास प्रक्रिया केंद्र चालविण्याच्या भाड्यापोटी देण्यात येणार आहेत. आतापर्यंत अधिभाराची नऊ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मनपाकडे जमा आहे. ठेकेदाराने ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची ३० टक्के रक्कम भागविण्यासाठी नागरिकांवर सांडपाणी अधिभार लावला आहे. पुढील १३ वर्षांसाठी नागरिकांच्या खिशालाही चाट लागणार आहे.विषारी विळखाप्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बी. ओ. डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक १० एम. जी. प्रती लिटरपेक्षा कमी असतो, तर सांडपाण्याचा बीओडी २०० एम. जी. प्रती लिटरपेक्षा अधिक असू शकतो. त्यावरून सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे महत्त्व लक्षात येते.