शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

७५ कोटींचा ‘एसटीपी’ही बिनकामी

By admin | Updated: April 29, 2015 00:25 IST

महापालिकेचा दावा फोल : गेले दोन दिवस जयंती नाल्याचे सांडपाणी थेट पंचगंगेत; नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापूर : कसबा बावडा येथे ७५ कोटी रुपये खर्चून उभारलेले घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कुचकामी ठरत असून, नेहमीप्रमाणे जयंती नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे नदीकाठच्या गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबत न्यायालयाने बॅँक गॅरटी जप्त व महापालिका बरखास्तीच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने ‘एसटीपी’ (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) पूर्ण करून २० एप्रिलपासून एसटीपीमध्ये प्रतिदिन ६० दशलक्ष लिटर (एमएलडी)हून अधिक मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. मात्र, प्रत्यक्षात रात्रीच्यावेळी केंद्र बंद ठेवून नफा कमावला जात आहे. जयंती नाल्यावर पुरेशी दूषित पाणी उपसा यंत्रणा नसल्याने शहरात पडलेल्या हलक्या पावसानेही नाला दोन-दोन दिवस थेट नदीत मिसळत आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे चोवीस तासांत २०० एमएलडीहून अधिक दूषित पाणी थेट नदीत मिसळले. परिणामी नदीकाठावरील गावांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.न्यायालयाच्या कारवाईच्या धास्तीने तातडीने प्रकल्प पूर्ण केल्याचे महापालिकेने दाखविले असले तरी प्रत्यक्षात जयंती नाल्यातून उपसा करण्यात येणाऱ्या सर्व पाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. दिवसा तोंडदेखलेपणासाठी केंद्र सुरू ठेवले जात आहे.(प्रतिनिधी)प्रकल्पाचा नागरिकांना भुर्दंडमहापालिकेने दोन वर्षांपासूनच पाणीपट्टी बिलात १० ते १५ टक्के वाढ केली आहे. सांडपाणी अधिभार सुरू करून हे पैसे संबंधित ठेकेदारास प्रक्रिया केंद्र चालविण्याच्या भाड्यापोटी देण्यात येणार आहेत. आतापर्यंत अधिभाराची नऊ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मनपाकडे जमा आहे. ठेकेदाराने ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची ३० टक्के रक्कम भागविण्यासाठी नागरिकांवर सांडपाणी अधिभार लावला आहे. पुढील १३ वर्षांसाठी नागरिकांच्या खिशालाही चाट लागणार आहे.विषारी विळखाप्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बी. ओ. डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक १० एम. जी. प्रती लिटरपेक्षा कमी असतो, तर सांडपाण्याचा बीओडी २०० एम. जी. प्रती लिटरपेक्षा अधिक असू शकतो. त्यावरून सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे महत्त्व लक्षात येते.