शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

७५ कोटींचा ‘एसटीपी’ही बिनकामी

By admin | Updated: April 29, 2015 00:25 IST

महापालिकेचा दावा फोल : गेले दोन दिवस जयंती नाल्याचे सांडपाणी थेट पंचगंगेत; नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापूर : कसबा बावडा येथे ७५ कोटी रुपये खर्चून उभारलेले घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कुचकामी ठरत असून, नेहमीप्रमाणे जयंती नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे नदीकाठच्या गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबत न्यायालयाने बॅँक गॅरटी जप्त व महापालिका बरखास्तीच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने ‘एसटीपी’ (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) पूर्ण करून २० एप्रिलपासून एसटीपीमध्ये प्रतिदिन ६० दशलक्ष लिटर (एमएलडी)हून अधिक मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. मात्र, प्रत्यक्षात रात्रीच्यावेळी केंद्र बंद ठेवून नफा कमावला जात आहे. जयंती नाल्यावर पुरेशी दूषित पाणी उपसा यंत्रणा नसल्याने शहरात पडलेल्या हलक्या पावसानेही नाला दोन-दोन दिवस थेट नदीत मिसळत आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे चोवीस तासांत २०० एमएलडीहून अधिक दूषित पाणी थेट नदीत मिसळले. परिणामी नदीकाठावरील गावांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.न्यायालयाच्या कारवाईच्या धास्तीने तातडीने प्रकल्प पूर्ण केल्याचे महापालिकेने दाखविले असले तरी प्रत्यक्षात जयंती नाल्यातून उपसा करण्यात येणाऱ्या सर्व पाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. दिवसा तोंडदेखलेपणासाठी केंद्र सुरू ठेवले जात आहे.(प्रतिनिधी)प्रकल्पाचा नागरिकांना भुर्दंडमहापालिकेने दोन वर्षांपासूनच पाणीपट्टी बिलात १० ते १५ टक्के वाढ केली आहे. सांडपाणी अधिभार सुरू करून हे पैसे संबंधित ठेकेदारास प्रक्रिया केंद्र चालविण्याच्या भाड्यापोटी देण्यात येणार आहेत. आतापर्यंत अधिभाराची नऊ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मनपाकडे जमा आहे. ठेकेदाराने ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची ३० टक्के रक्कम भागविण्यासाठी नागरिकांवर सांडपाणी अधिभार लावला आहे. पुढील १३ वर्षांसाठी नागरिकांच्या खिशालाही चाट लागणार आहे.विषारी विळखाप्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बी. ओ. डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक १० एम. जी. प्रती लिटरपेक्षा कमी असतो, तर सांडपाण्याचा बीओडी २०० एम. जी. प्रती लिटरपेक्षा अधिक असू शकतो. त्यावरून सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे महत्त्व लक्षात येते.