शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नदी अडवून जॅकवेलकडे वळविली

By admin | Updated: February 8, 2016 00:48 IST

म्हाकवेतील प्रकार : जॅकवेलच्या चुकीच्या उभारणीमुळे ग्रामपंचायतीचा खटाटोप

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे --जॅकवेल कुठे असते? असा कोणत्याही शाळकरी मुलाला प्रश्न विचारला तरी तो बिनचूक उत्तर देईल की जॅकवेल नदीत असते. परंतु, म्हाकवे (ता. कागल) येथे जॅकवेलची जगावेगळी उभारणी केल्याने येथील जॅकवेल नदीत नसून, नदीच अडवून जॅकवेलमध्ये वळविण्यात आली आहे. सध्या काळम्मावाडी धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे वेदगंगा नदीत पाणी सोडण्यावर प्रशासनाने नियंत्रण आणले आहे. त्याचा परिणाम म्हाकवेतील पाणीपुरवठ्यावर होत आहे. येथील जॅकवेल नदीकाठावर नदीतील पाणी पातळीपेक्षा उंचावर बांधण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात कच्चा बंधारा घालून पाणी अडवून ते जॅकवेलमध्ये आणले आहे. परंतु, कच्चा बंधारा आणि जॅकवेलची उंची पाहता यातूनही अपुरेच पाणी जॅकवेलमध्ये येत आहे. त्यामुळे नदीतील पाणी विद्युत पंपाद्वारे जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी ग्रामस्थांना हाच आर्थिक ओरखडे काढणारा पर्याय ग्रामपंचायतीसमोर उरला आहे.वेदगंगा नदीत पाणी कमी असल्याने गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना ग्रामपंचायतीची चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना तारेवरची कसरत आणि उपद्व्याप करावा लागत आहे. सध्या गावाला दोन-तीन दिवसांतून नदीतून थेट उपसा पद्धतीनेच पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना अशुद्ध, गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. याकडे एकाही अधिकाऱ्याने गांभीर्याने पाहिलेले नसून, डोळेझाकपणाच करण्यात धन्यता मानली आहे. सुमारे सात हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावात येथील लोकप्रतिनिधींनी गेल्या तीन दशकांमध्ये अनेक योजनांतून शासनाकडून निधी उपलब्ध करून पाणी योजना केल्या आहेत. परंतु, या पाणी योजनांतून ग्रामस्थांची तृष्णा भागविली जाते का, याचे भान निधी देणाऱ्या आणि तो खर्च करणाऱ्यांना नाही. म्हाकवेकरांना ‘गढूळाचे’च पाणी!म्हाकवे गावच्या डाव्या-उजव्या बाजूला असणाऱ्या आणूर, कौलगे, बस्तवडे या गावांना एक-दोनच पाणी योजना झाल्या आहेत, तर या गावांचे जॅकवेलही याच नदीत सुमारे २५ ते ३० फूट खोलीवर आहे. त्यामुळे नदीला अपुरे पाणी असताना किंवा महापुराच्या काळातही येथे स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळते. मात्र, म्हाकवे येथे याच योजना होऊनही अपुरे आणि गढूळच पाणी मिळते, ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत.‘आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी या पाणीयोजना झाल्या आहेत. गावचा पाणीप्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच सदस्य समिती एकटवली असून, स्थानिक व वरिष्ठ लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांशी विचारविनिमय, बैठक सुरू असून, यासंदर्भात आम्ही लवकरच पर्यायी मार्ग काढू.’- रमेश सिद्राम पाटील, उपसरपंच, म्हाकवे.