शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

पाण्यासाठी नदी अडवून जॅकवेलकडे वळविली

By admin | Updated: February 8, 2016 00:48 IST

म्हाकवेतील प्रकार : जॅकवेलच्या चुकीच्या उभारणीमुळे ग्रामपंचायतीचा खटाटोप

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे --जॅकवेल कुठे असते? असा कोणत्याही शाळकरी मुलाला प्रश्न विचारला तरी तो बिनचूक उत्तर देईल की जॅकवेल नदीत असते. परंतु, म्हाकवे (ता. कागल) येथे जॅकवेलची जगावेगळी उभारणी केल्याने येथील जॅकवेल नदीत नसून, नदीच अडवून जॅकवेलमध्ये वळविण्यात आली आहे. सध्या काळम्मावाडी धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे वेदगंगा नदीत पाणी सोडण्यावर प्रशासनाने नियंत्रण आणले आहे. त्याचा परिणाम म्हाकवेतील पाणीपुरवठ्यावर होत आहे. येथील जॅकवेल नदीकाठावर नदीतील पाणी पातळीपेक्षा उंचावर बांधण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात कच्चा बंधारा घालून पाणी अडवून ते जॅकवेलमध्ये आणले आहे. परंतु, कच्चा बंधारा आणि जॅकवेलची उंची पाहता यातूनही अपुरेच पाणी जॅकवेलमध्ये येत आहे. त्यामुळे नदीतील पाणी विद्युत पंपाद्वारे जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी ग्रामस्थांना हाच आर्थिक ओरखडे काढणारा पर्याय ग्रामपंचायतीसमोर उरला आहे.वेदगंगा नदीत पाणी कमी असल्याने गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना ग्रामपंचायतीची चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना तारेवरची कसरत आणि उपद्व्याप करावा लागत आहे. सध्या गावाला दोन-तीन दिवसांतून नदीतून थेट उपसा पद्धतीनेच पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना अशुद्ध, गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. याकडे एकाही अधिकाऱ्याने गांभीर्याने पाहिलेले नसून, डोळेझाकपणाच करण्यात धन्यता मानली आहे. सुमारे सात हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावात येथील लोकप्रतिनिधींनी गेल्या तीन दशकांमध्ये अनेक योजनांतून शासनाकडून निधी उपलब्ध करून पाणी योजना केल्या आहेत. परंतु, या पाणी योजनांतून ग्रामस्थांची तृष्णा भागविली जाते का, याचे भान निधी देणाऱ्या आणि तो खर्च करणाऱ्यांना नाही. म्हाकवेकरांना ‘गढूळाचे’च पाणी!म्हाकवे गावच्या डाव्या-उजव्या बाजूला असणाऱ्या आणूर, कौलगे, बस्तवडे या गावांना एक-दोनच पाणी योजना झाल्या आहेत, तर या गावांचे जॅकवेलही याच नदीत सुमारे २५ ते ३० फूट खोलीवर आहे. त्यामुळे नदीला अपुरे पाणी असताना किंवा महापुराच्या काळातही येथे स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळते. मात्र, म्हाकवे येथे याच योजना होऊनही अपुरे आणि गढूळच पाणी मिळते, ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत.‘आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी या पाणीयोजना झाल्या आहेत. गावचा पाणीप्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच सदस्य समिती एकटवली असून, स्थानिक व वरिष्ठ लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांशी विचारविनिमय, बैठक सुरू असून, यासंदर्भात आम्ही लवकरच पर्यायी मार्ग काढू.’- रमेश सिद्राम पाटील, उपसरपंच, म्हाकवे.