शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

‘काम बंद’ आंदोलन स्थगित प्रश्न गटसचिवांचा

By admin | Updated: July 24, 2014 00:30 IST

दोन टक्के व्याज परताव्यास तत्त्वत: मान्यता

कोल्हापूर : विकास सेवा संस्थांनी वाटप केलेल्या पीक कर्जावर २ टक्के व्याज परतावा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज, बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ३० जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत केली जाणार असून, गेले दीड महिना सुरू असलेला संप स्थगित करण्याची घोषणा संघटनेने केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत शून्य टक्के, तर तेथून पुढे अल्प व्याजदराने पीक कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने विकास सेवा संस्था अडचणीत आल्या आहेत. व्याजाचे मार्जिन कमी झाल्याने संस्था चालवायच्या कशा, असा प्रश्न संस्थाचालक व गटसचिवांपुढे आहे. जिल्ह्यातील साडेपाचशे संस्था अनिष्ट दुराव्यात गेल्या आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याने अनेक संस्थांना कुलपे लागण्याची वेळ आली आहे, अशा परिस्थितीत संस्था वाचविण्यासाठी गटसचिव संघटनेने पुढाकार घेत शासनाने मदत करण्याची मागणी केली. एकूण पीक कर्जाच्या ३ टक्के व्याज परतावा शासनाने द्यावा, अशी मागणी केली होती. वित्त विभागाने राज्यासाठी २३५ कोटींचा (परतावा १.८० टक्के) प्रस्ताव सादर केला आहे. विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून राज्यात सुमारे १३ हजार कोटींचे पीक कर्जवाटप होते. त्यानुसार २३५ कोटी रुपये संस्थांना देण्यास आज तत्त्वत: मान्यता दिली. संप मागे घेतल्यानंतर पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलावून सांगितले. यावेळी संघटनेचे अर्जुन पाटील, संभाजीराव चाबूक, लक्ष्मण कडव, देविदास बोराडे, आदी उपस्थित होते. वित्त विभागाने २३५ कोटींचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला; पण त्याची टिप्पणी वेळेत न झाल्याने त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत बोलावून प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देत पुढील बैठकीत अंतिम मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. संप मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार संप मागे घेतला असून, उद्यापासून गटसचिव संस्थांमध्ये जातील. - संभाजीराव चाबूक, जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना जिल्ह्यातील स्थिती : विकास सेवा संस्था - १८२५, अनिष्ट दुराव्यात - सुमारे ५५०, गटसचिव - १४००पीक कर्ज - ८०० कोटी, परतावा किती मिळणार - १४ कोटी ४० लाख रुपये. गेली तीन वर्षे गटसचिव संघटनेने व्याज परताव्याची मागणी शासनदरबारी लावून धरली होती. अनेकवेळा राजकीय दबाव झुगारूनही त्यांनी संस्था टिकल्या पाहिजेत, यासाठी संपाचे हत्यार उपसले. ‘आता नाही, तर केव्हाच नाही’, या इराद्याने पदाधिकारी गेले दीड महिना प्रयत्नशील होते.