शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

आजरा शहरात मंजुरीपूर्वी सुरू असलेली कामे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

आजरा : आजरा शहरात मंजुरीपूर्वी अ‍ॅडव्हान्समध्ये सुरू असलेली गटरसह अन्य विकासकामे तातडीने थांबवावीत व नगरपंचायतीच्या गाळ्यांचे वर्गीकरण करून स्क्वेअर ...

आजरा : आजरा शहरात मंजुरीपूर्वी अ‍ॅडव्हान्समध्ये सुरू असलेली गटरसह अन्य विकासकामे तातडीने थांबवावीत व नगरपंचायतीच्या गाळ्यांचे वर्गीकरण करून स्क्वेअर फुटावर भाडे आकारणी करावी, अशी मागणी नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांनी केली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.

मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी स्वागत केले. विषयपत्रिका वाचन संजय यादव यांनी केले.

आजरा नगरपंचायतीचे मुख्य इमारत, जनता मार्केट, हनुमान संकुल, भाजी मंडई, विद्याधन कॉम्प्लेक्स या ठिकाणी १२६ दुकानगाळे आहेत. सदरच्या गाळ्यांची भाडेवाढ ५ वर्षांपूर्वी केलेली आहे. त्यामुळे नवीन भाडेवाढ करावी, असा विषय सभेसमोर प्रशासनाने आणला. यावर शुभदा जोशी यांनी आतापर्यंत गाळ्यांचे भाडे किती जमा झाले व ते पैसे कुठे आहेत असा प्रश्न केला.

नगरपालिका फंडात गाळ्यांचे १४ लाख ४४ हजार जमा असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. सरसकट गाळ्यांचे भाडेवाढ नको तर गाळ्यांचे वर्गीकरण करा आणि वर्गीकरणानंतर स्क्वेअर फूट याप्रमाणे भाडेवाढ केली जावी, अशी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी मागणी केली. गाळे भाडेवाढीसाठी अधिकारी व नगरसेवक यांची संयुक्त कमिटी करून त्यामध्ये भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जावा असेही शिंपी यांनी सूचविले.

आठवडी बाजार करवसुलीसाठी निविदेला प्रतिसाद मिळत नाही, असे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. विशिष्ट बँकेत खाते काढल्यानंतर संगणक देणार, कच-यासाठी बादल्या देणार असे सांगितले होते, त्याचे काय झाले असा प्रश्न संभाजी पाटील यांनी केला.

एसटी स्टँडशेजारी नाईक गल्लीत ग्रामपंचायतीचे गाळे बांधण्याला नगरसेविका रेश्मा सोनेखान यांनी विरोध केला.

आजरा शहरात मंजुरीपूर्वी अ‍ॅडव्हान्स कामे सुरू आहेत ती तातडीने थांबवावीत, अशी मागणी संभाजी पाटील यांनी केली. ग्रामपंचायत काळातील बिले गेली तीन वर्षे दिली जात आहेत व आता केली जाणारी मंजुरी पूर्वीच्या कामांचे बिल पुढील पाच वर्षांत देणार काय? असा सवाल अस्मिता जाधव यांनी केला. प्रत्येक सदस्यांना मिळालेल्या निधीप्रमाणे विकासकामे वाटून द्यावीत.

गेली तीन वर्षे आमच्या प्रभागात विकासकामे झाले नाहीत, असा आरोप संजीवनी सावंत यांनी केला. सभेस विलास नाईक, संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, आलम नाईकवाडे, रेश्मा सोनेखान, यासिराबी लमतुरे, स्मिता पवार, संजीवनी सावंत, यास्मिन बुढ्ढेखान, अस्मिता जाधव, शुभदा जोशी व अधिकारी उपस्थित होते.