शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

यड्रावमध्ये पाण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: December 30, 2014 00:05 IST

महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा : अनियमित, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

यड्राव : येथील बेघर व गावठाण परिसरात अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज, सोमवारी रास्ता रोको केला. नंतर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंच नसल्याने सदस्यांना रोषास सामोरे जावे लागले. योग्य दाबाने व नियमित पाणीपुरवठ्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन महिलांना मिळाल्याने मोर्चाची सांगता झाली. नुकत्याच सुरू झालेल्या पाणी योजनेबाबत ग्रामस्थांतून तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेमधून सध्या पाणीपुरवठा होतो. गेल्या पाच दिवसांपासून बेघर व गावठाण परिसरात पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. काल, रविवारी सायंकाळी बेघर परिसरात पाणीपुरवठा झाला; परंतु तो कमी दाबाने व अपुरा झाला. त्यापाठोपाठ आज, सोमवारीही उर्वरित गावठाणामध्ये अपुरा पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. महिला एकत्रित जमल्याने त्यांनी अल्फोन्सा स्कूलकडून येणाऱ्या मार्गावर मोकळ्या घागरी घेऊन एक तासभर रास्ता रोको केला. तेथून सर्वजण मिळून ग्रामपंचायत कार्यालयाकडे मोर्चाने आल्या. त्या ठिकाणी सरपंच व उपसरपंच नसल्याने उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे, अर्जुन आदमाने व ग्रामविकास अधिकारी जी. डी. आदलिंग यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला व ठोस कृती झाल्याशिवाय येथून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्याने महिलांनी मोर्चाची सांगता केली. पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असल्याने पाणी योजनेच्या कामाबाबत ग्रामस्थांमधून तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. मोर्चामध्ये रोशन मिरजकर, विमल डोके, नजमा सय्यद, शांताबाई शेळके, नंदा कांबळे यांच्यासह ५०हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)