शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकला जाणारे पाणी थांबवा...

By admin | Updated: April 13, 2017 22:51 IST

जिल्ह्यातील आमदारांची मागणी : कोयना धरणाकाठची गावे दुष्काळी होण्याची व्यक्त केली भीती

सातारा : कोयना धरणातून कर्नाटक राज्याला पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी जिल्हा टंचाई आढावा बैठकीत केली. अडीच टीएमसी पाणी गेल्यास कोयना धरणाच्या काठी असणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा नियोजन भवनामध्ये टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कर्नाटक राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोयना धरणातून २.६४ टीएमसी पाणी कर्नाटकला देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडायला सुरुवात झाली. याचे पडसाद गुरुवारी झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीत उमटले. ‘कोयनेतून कर्नाटला पाणी सोडायचा निर्णय हा लोकप्रतिनिधींनी अंधारात ठेवून घेतला आहे. कोयनेत मागील वर्षीपेक्षा दुप्पट पाणी साठा असल्याची दिशाभूल करणारी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशामुळे कोयना धरणाच्या काठावर असणारी गावे दुष्काळग्रस्त होतील,’ अशी भीती पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. यावर पालकमंत्र्यांनी खुलासा करताना ‘कोयना धरणातील जितके पाणी आपण कर्नाटक राज्याला देणार आहोत, तितकेच पाणी येत्या पावसाळ्यानंतर कर्नाटक आपल्याला देणार आहे, त्याचा रितसर करार सरकारने केला आहे,’ असे सांगितले. मात्र, ‘आपल्याला पुरेसे पाणी उरणार नाही. उन्हाळ्यात गावांना टंचाईला सामोरे जावे लागेल. यासाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा,’ असे मत आमदार देसाई यांनी व्यक्त केले. त्यांना आमदार मकरंद पाटील यांच्यासह इतर आमदारांनीही पाठिंबा दिला. ‘आमच्याकडे जास्त पाऊस पडतो. मात्र, इतरांना पाणी देण्याच्या नादात आम्ही दुष्काळी व्हायला लागलोय,’ अशी खंत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)