शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

..तर ऊसतोडणी बंद करणार

By admin | Updated: November 1, 2014 00:42 IST

कामगारांचा मोर्चा : कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी इशारा

कोल्हापूर : राज्यातील दहा लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या वेतनवाढीचा करार आणि कल्याणकारी महामंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत ऊसतोडणी सुरू केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने आज, शुक्रवारी मोर्चाद्वारे दिला. जिल्ह्यातील ऊसतोडणी व वाहतूककामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता, त्यावेळी हा इशारा देण्यात आला. राज्यातील साखर कारखाने सुरू होत असतानाच कामगारांनी असा इशारा दिल्यामुळे यंदाही हंगाम सुुरू होण्यापूर्वीच अडचणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील ऊसतोडणी, वाहतूक, बैलगाडीवान, मुकादमांच्या संघटनेने आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्ह्यातील संपाची सुरुवात केली. मोर्चा लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यामध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. निदर्शनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले, प्रा. आर. एन. पाटील, दिनकर आदमापुरे, आदींचा समावेश होता. राज्य सरकार व राज्य साखर संघाने हा संप कामगारांवर लादला आहे. गेल्या हंगामाबरोबर ऊसतोडणी व वाहतुकीच्या दराबाबतच्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराची मुदत संपली. महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने २०१४-१५ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नवीन करार करावा यासाठी जून २०१४ मध्ये मागण्यांचे निवेदन आणि संपाची नोटीस दिली होती; परंतु सरकार व राज्य साखर संघ यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत दोन बैठका झाल्या; परंतु अंतिम निर्णय झाला नाही, म्हणून ऊसतोडणी बंद करण्यात येत असल्याचे डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.