शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

..तर ऊसतोडणी बंद करणार

By admin | Updated: November 1, 2014 00:42 IST

कामगारांचा मोर्चा : कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी इशारा

कोल्हापूर : राज्यातील दहा लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या वेतनवाढीचा करार आणि कल्याणकारी महामंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत ऊसतोडणी सुरू केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने आज, शुक्रवारी मोर्चाद्वारे दिला. जिल्ह्यातील ऊसतोडणी व वाहतूककामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता, त्यावेळी हा इशारा देण्यात आला. राज्यातील साखर कारखाने सुरू होत असतानाच कामगारांनी असा इशारा दिल्यामुळे यंदाही हंगाम सुुरू होण्यापूर्वीच अडचणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील ऊसतोडणी, वाहतूक, बैलगाडीवान, मुकादमांच्या संघटनेने आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्ह्यातील संपाची सुरुवात केली. मोर्चा लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यामध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. निदर्शनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले, प्रा. आर. एन. पाटील, दिनकर आदमापुरे, आदींचा समावेश होता. राज्य सरकार व राज्य साखर संघाने हा संप कामगारांवर लादला आहे. गेल्या हंगामाबरोबर ऊसतोडणी व वाहतुकीच्या दराबाबतच्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराची मुदत संपली. महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने २०१४-१५ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नवीन करार करावा यासाठी जून २०१४ मध्ये मागण्यांचे निवेदन आणि संपाची नोटीस दिली होती; परंतु सरकार व राज्य साखर संघ यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत दोन बैठका झाल्या; परंतु अंतिम निर्णय झाला नाही, म्हणून ऊसतोडणी बंद करण्यात येत असल्याचे डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.