शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
5
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
6
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
7
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
8
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
9
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
10
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
11
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
12
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
13
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
14
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
15
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
16
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
17
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
18
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
19
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
20
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

सरसकट कर्जमाफीसाठी वडणगे फाटा येथे रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 13:31 IST

कोल्हापूर : भाजप सरकार निवडणूकीत आश्वासनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले, पण त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कर्जमाफीमध्ये मखलाशी करून शेतकºयांना फसवले आहे, अशा सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा कॉ. अनिल चव्हाण यांनी दिला. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे सुकाणू समिती कार्यकत्यांचा वडणगे फाटा येथे रस्ता रोको दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीतअर्धा तास कार्यकत्यांचा रस्त्यावर ठिय्यासरकारच्या निषेधासह आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजीशेतकºयांना फसवणाºया सरकारला धडा शिकवणार : अनिल चव्हाण

कोल्हापूर : भाजप सरकार निवडणूकीत आश्वासनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले, पण त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कर्जमाफीमध्ये मखलाशी करून शेतकºयांना फसवले आहे, अशा सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा कॉ. अनिल चव्हाण यांनी दिला.

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अर्धा तास कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सरकारच्या निषेधासह सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना कॉ. अनिल चव्हाण यांनी सरकारवर सडकून टीका केली. भाजप सरकारला निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असून त्यांना जागे करण्यासाठी आक्रमक आंदोलन हाती घ्यावे लागणार आहे. याचा पहिला टप्पा म्हणून रस्ता रोको केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

निम्मा महाराष्टÑ दुष्काळात होरपळत आहे, शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, पण सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक दिसत नसल्याचे बी. एल. बरगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस. आर. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

पोलीसांनी हस्तक्षेप करत आंदोलन कर्त्यांना बाजूला केल्यानंतर वहातूक पुर्ववत सुरू झाली. यावेळी अ‍ॅड. अजित पाटील, आदम मुजावर, नारायण मोरे, विलास चौगले, भिकाजी पाटील, आंनदा तिटवे, उत्तम चौगुले, संपत दळवी, संग्राम मांगलेकर आदी उपस्थित होते.नोटाबंदीमुळे व्यवसाय संपले!

नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल, असे केंद्र सरकारने सामान्य माणसाला भासवले. नोटाबंदी नंतर शेतकºयांचे कंबरडे मोडलेच पण त्याचबरोबर व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगारी वाढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.