शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

सरसकट कर्जमाफीसाठी वडणगे फाटा येथे रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 13:31 IST

कोल्हापूर : भाजप सरकार निवडणूकीत आश्वासनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले, पण त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कर्जमाफीमध्ये मखलाशी करून शेतकºयांना फसवले आहे, अशा सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा कॉ. अनिल चव्हाण यांनी दिला. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे सुकाणू समिती कार्यकत्यांचा वडणगे फाटा येथे रस्ता रोको दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीतअर्धा तास कार्यकत्यांचा रस्त्यावर ठिय्यासरकारच्या निषेधासह आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजीशेतकºयांना फसवणाºया सरकारला धडा शिकवणार : अनिल चव्हाण

कोल्हापूर : भाजप सरकार निवडणूकीत आश्वासनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले, पण त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कर्जमाफीमध्ये मखलाशी करून शेतकºयांना फसवले आहे, अशा सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा कॉ. अनिल चव्हाण यांनी दिला.

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अर्धा तास कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सरकारच्या निषेधासह सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना कॉ. अनिल चव्हाण यांनी सरकारवर सडकून टीका केली. भाजप सरकारला निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असून त्यांना जागे करण्यासाठी आक्रमक आंदोलन हाती घ्यावे लागणार आहे. याचा पहिला टप्पा म्हणून रस्ता रोको केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

निम्मा महाराष्टÑ दुष्काळात होरपळत आहे, शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, पण सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक दिसत नसल्याचे बी. एल. बरगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस. आर. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

पोलीसांनी हस्तक्षेप करत आंदोलन कर्त्यांना बाजूला केल्यानंतर वहातूक पुर्ववत सुरू झाली. यावेळी अ‍ॅड. अजित पाटील, आदम मुजावर, नारायण मोरे, विलास चौगले, भिकाजी पाटील, आंनदा तिटवे, उत्तम चौगुले, संपत दळवी, संग्राम मांगलेकर आदी उपस्थित होते.नोटाबंदीमुळे व्यवसाय संपले!

नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल, असे केंद्र सरकारने सामान्य माणसाला भासवले. नोटाबंदी नंतर शेतकºयांचे कंबरडे मोडलेच पण त्याचबरोबर व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगारी वाढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.