शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

इचलकरंजी येथे रास्ता रोको

By admin | Updated: February 9, 2015 00:37 IST

अर्धा तास ठिय्या : महा ई सेवा केंद्र उघडले नसल्यावरून नागरिक संतप्त

इचलकरंजी : रविवार सुटी असूनही आधार कार्ड काढून देण्यासाठी येथील गावचावडीजवळचे महा ई सेवा केंद्र सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्र चालू न ठेवल्यामुळे संतप्त नागरिकांनी सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला. घटनास्थळी आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी आंदोलक महिला-पुरुषांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. विविध शासकीय योजनांतून मिळणारे अनुदान थेट बॅँक खात्यावर जमा होणार असल्याने बॅँक खात्याला, स्वयंपाकाचा गॅस व रेशनिंग कार्डाला आधार कार्ड जोडणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे आधार कार्ड काढून घेण्यासाठी महा ई सेवा केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. त्याप्रमाणे गेल्या आठवडाभर अधिक काळ येथील गावचावडीजवळील महा ई सेवा केंद्रावर आधार कार्डासाठी मोठी गर्दी होती. रविवारी सुटी असूनसुद्धा अनेक नागरिकांना आधार कार्ड काढून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच या महा ई सेवा केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. रविवारी सकाळी साडेदहा वाजून गेले तरी केंद्र उघडले नसल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता वाढू लागली. काही वेळाने अद्याप केंद्र उघडले जात नाही; पण केंद्र चालकाच्यावतीने कुणी तरी येऊन आधार कार्डाची इंटरनेट लाईन बंद असल्याचा फलक लावला. त्यामुळे आणखीनच संतप्त झालेल्या नागरिकांनी अचानकपणे रस्त्यावर जाऊन ठिय्या मारला. यावेळी केंद्रचालकाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलन स्थळापासून जवळच असलेल्या गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी आंदोलक महिलांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आंदोलकांना शांत केले. रविवारी केंद्रावर आलेल्या नागरिकांच्या कार्डाविषयी आज, सोमवारी केंद्र चालकाकडे चर्चा करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)विविध शासकीय योजनांचे अनुदान थेट बॅँक खात्यावर जमा होणार असल्याने स्वयंपाकाचा गॅस व रेशनिंग कार्डाला आधार कार्ड गरजेचे आहे.आधार कार्ड काढून घेण्यासाठी महा ई केंद्रावर गेल्या आठ दिवसांपासून सकाळी सात वाजल्यापासून गर्दी