शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात पाण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: August 24, 2016 01:00 IST

संतप्त महिलांचा ठिय्या : खराब पाईपलाईन बदलण्याच्या प्रारंभानंतरच आंदोलन मागे; पालिकेचे अधिकारी धारेवर

कसबा बावडा : शहरात पाण्यासाठी अनेकवेळा ठिकठिकाणी रास्ता रोको, आंदोलने झाली, त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन काही तरी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले जात असल्याचा आजवरचा अनुभव; मात्र याला मंगळवारी कसबा बावड्यातील धनगर गल्लीतील महिलांनी पाण्यासाठी केलेले रास्ता रोकोचे आंदोलन अपवाद ठरले. महापौर अश्विनी रामाणे यांनी खराब पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ केल्यानंतरच संतप्त महिलांनी हे आंदोलन मागे घेतले. गेली अनेक वर्षे धनगर गल्ली, कवडे गल्ली, चौगले गल्ली, चव्हाण गल्ली, वाडकर गल्ली, आदी भागांत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे; मात्र याचा सर्वाधिक फटका धनगर गल्लीतील नागरिकांना बसत होता. या गल्लीतील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून आतापर्यंत महापौर, आयुक्त, जलअभियंता व नगरसेवक यांना वारंवार निवेदन दिली. तसेच दोनवेळा रास्ता रोकोही केला. परंतु, प्रत्येक वेळी या गल्लीतील नागरीकांना आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. मंगळवारपासून दररोज पाणीपुरवठा करण्याची घोषणा महापालिकेने सर्वसाधारण सभेत केली होती. मात्र, पहिल्याच दिवशी धनगर गल्लीत अपुरे व कमी दाबाने पाणी आल्याने येथील संतप्त महिलांनी नियमीत पाणी पुरवठ्याची मागणी करीत मुख्य रस्त्यावर तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलनात महिला घागरी व पाण्याच्या बादल्या घेऊनच सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याबाबत सांगितले; मात्र त्या जागच्या हालल्या नाहीत. यामुळे ऐन रहदारीवेळीच वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडली. दुपारी एकच्या सुमारास महापौर अश्विनी रामाणे, उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पोवार आंदोलनस्थळी आले. मात्र, त्यांच्यावर महिलांनी प्रश्नांचा भडिमार केला. दोन-अडीच हजार पाण्याचे बिल घेता, सांडपाणी चार्ज घेता; पण पाणी मात्र वेळेवर येत नाही, असा सवाल करताच सर्व अधिकारी निरुत्तर झाले. आंदोलकांना उपायुक्त, जलअभियंता यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, महापौर अश्विनी रामाणे यांनी खराब पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ केल्यानंतरच संतप्त महिलांनी हे आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक अशोक जाधव यांनी यासाठी सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.या आंदोलनात कल्पना वावरे, संगीता धामणे, मंगल करपे, वृत्तपत्र विक्रेते शंकर चेचर, अभिजित जाधव, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची महिलांशी चर्चाआंदोलनस्थळी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अनेक अधिकारी दाखल झाले. त्यांनी आंदोलन मागे घेण्यासंदर्भात इतर नागरिकांशी चर्चा सुरू केली; मात्र संतप्त महिलांनी पाणी पुरुष भरत नाहीत, महिला भरतात. त्यामुळे महिलांशी चर्चा करा, असा सज्जड दमच दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांना महिलांशी चर्चा करणे भाग पाडले.