शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ई-काॅमर्स कंपन्यांकडून होणारी नियमबाह्य विक्री थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाइल रिटेलर्सनीही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले आहेत; परंतु ...

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाइल रिटेलर्सनीही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले आहेत; परंतु या काळात विदेशी ई-काॅमर्स कंपन्या शासनाचे नियम न पाळता इतर वस्तूंची राजरोसपणे विक्री करीत आहेत. या कंपन्यांच्या नियमबाह्य प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी नियमांचा भंग करणाऱ्या या कंपन्यांंवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

लाॅकडाऊन काळात विविध समस्या मांडण्यासाठी असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, असोसिएशनने केलेल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. व्यापारी वर्गाला दिलासा देणारे निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. लवकरच याबाबत स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही केली जाईल. येत्या काळात जास्तीत जास्त मोबाइल रिटेलर्सबरोबर झूम मीटिंगद्वारे संवाद साधायला आवडेल. यावेळी असाेसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलाश लखयानी, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा, राष्ट्रीय सरचिटणीस भावेश सोळंकी, सहसचिव नवनीत पाठक, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, सरचिटणीस जुझेर ढोरजीवाला सहभागी झाले होते.

मागण्या अशा,

मोबाइल व्यावसायिक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. दुकाने बंद असल्याने वीज बिलांच्या स्थिर आकारात सवलत द्यावी. ई-काॅमर्स कंपन्यांना अवैध विक्री करण्यासपासून रोखावे.

कोट

राज्यात कडक लाॅकडाऊन असताना अनेक विदेशी कंपन्या मोबाइलसह इतर वस्तू सर्रास विक्री करीत आहेत. त्यांच्यामुळे रिटेलर्सचे मोठे नुकसान होत आहे. रिटेलर्स प्रामाणिकपणे नियम पाळत आहेत. त्यामुळे अशा विदेशी कंपन्यांवर कडक कारवाई करावी.

-विभूती प्रसाद,

वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन