शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचे विद्रुपीकरण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:13 IST

श्रीपाल सबनीस : महाराष्ट्र घडवण्यासाठी इमानदार लेखक, वाचकांची गरज

आजरा : जोपर्यंत मानव जिवंत आहे, तोपर्यंत संस्कृती टिकून राहणार आहे. वाचनाची पद्धत बदलली तरी वाचन प्रक्रिया अखंड आहे. आज महापुरुषांना इतिहासाचे विदु्रपीकरण करून जातींच्या चौकटीत कोंडून मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी इतिहासाचे विद्रुपीकरण थांबवा व यासाठी लेखक, समीक्षक व वाचकांनी इनामदारीने वागण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राची वाचन संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते.डॉ. सबनीस म्हणाले, वाचनालये ही समाजाची मंदिरे आहेत. मंदिर संस्कृती कमी पडल्यानंतर मानवी जीवनातील भौतिक दु:खे दूर करण्यासाठी वाचनालये उदयास आली. महाराष्ट्रामध्ये ज्ञानाची भूक कायम आहे. माहितीने परिपूर्ण असणाऱ्या २१ व्या शतकात धर्म-जातीमध्ये अडकून संतांची वाटणी करणे चुकीचे आहे.सर्व संत आत्मिक भावाने एकमेकांशी तादात्म्य पावले असताना त्यांच्यामध्ये भेदरेषा निर्माण करणारे आपण कोण. या भेदरेषेमुळे वाचकांमध्येही गट पडले आहेत. लेखकही सोयीनुरूप महापुरुषांचे सादरीकरण करू लागल्याने समृद्ध व सत्यनिष्ठ वाचक तयार होण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संदर्भ विश्वाला आवश्यक आहे. वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे साहित्य मागे पडत आहे, ही जमेची बाजू आहे. यावेळी डॉ. सबनीस यांनी वाचन व साहित्यसंस्कृतीचा चौफेर आढावा घेतला.याप्रसंगी संभाजीराव इंजल, जयराम देसाई, डॉ. शिवशंकर उपासे, सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई, सुभाष विभूते, प्रा. राजा शिरगुप्पे, मल्लाप्पाण्णा चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व साहित्यप्रेमी उपस्थित होते.