शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

मुश्रीफ यांची बदनामी थांबवा, अन्यथा जशास तसे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपला पोटशूळ उठला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपला पोटशूळ उठला आहे. त्यातूनच ते रोज एका मंत्र्यावर आरोप करत सुटले असून, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर या द्वेषातूनच किरीट सोमय्यांनी आरोप केले आहेत, त्याचा निषेध करतो. राजकारणातील ३०-४० वर्षे सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्यावर सवंग लोकप्रियता व भाजप प्रदेशाध्यक्षांना बरे वाटावे म्हणून कोणी बदनामी करत असेल, तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील व जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील, संचालक आर. के. पोवार यांनी दिला.

कागलच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली उभी हयात घालवली. पक्ष देईल त्या खात्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा करता येईल, हेच त्यांनी आतापर्यंत पाहिले. कागल, उत्तूर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांनी संताजी घोरपडे कारखान्याची उभारणी केली. हजारो शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे या कारखान्याच्या उभारणीत आहेत. मात्र, सत्ता गेल्याने सैरभैर झालेल्या काही मंडळींनी किरीट सोमय्या यांचे कान भरून आरोप करायला लावले. यातून काहीही निष्पन्न होणार नाही, हे निश्चित आहे.

ग्रामविकास विभागाच्यावतीने त्यांनी गेल्या दीड वर्षात गावे, वाड्या-वस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे. अशा कर्तबगार व जनतेची कणव असणाऱ्या नेत्यावर कोणी चिखलफेक करीत असेल, तर कोल्हापूरची जनता कदापी सहन करणार नसल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.