शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

दलित वस्ती सुधारणा योजना निधी तातडीने थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्य सरकारमार्फत मिळालेला दलित वस्ती सुधारणा योजनेतील निधी चुकीच्या पध्दतीने खर्च करण्यात येत असल्याने हा निधी सोडू ...

कोल्हापूर : राज्य सरकारमार्फत मिळालेला दलित वस्ती सुधारणा योजनेतील निधी चुकीच्या पध्दतीने खर्च करण्यात येत असल्याने हा निधी सोडू नये, तो तात्काळ थांबवावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना केली.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होत आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून प्रभाग आरक्षणदेखील टाकले आहेत. सध्या शहरातील ज्या अकरा प्रभागावर अनुसूचित जातीचे आरक्षण पडले आहे, त्या प्रभागाना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाने खर्च करायचे ठरविले आहे. निवडणूक नियमावलीनुसार जरी अकरा प्रभागावर अनुसूचित जातीचे आरक्षण पडले असले तरी, अशा प्रभागात दलित वस्ती फारच कमी आहे. त्यामुळे ज्या हेतूने राज्य सरकारने निधी दिला आहे, तो हेतू साध्य होत नाही. दलित वस्तीतूनच हा निधी खर्च झाला पाहिजे, असा जीआर आहे. मग दलित वस्ती सोडून जर दुसरीकडे निधी गेला असेल, तर तात्काळ तो थांबवावा, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आरक्षण पडलेल्या अकरा प्रभागांना प्रत्येकी एक कोटींचा निधी दिली आहे. त्याचे एस्टिमेट व कामांची मंजुरी सुध्दा झाली आहे. कामे सुरू होण्याची शक्यता आहे. आता अशा टप्प्यावर हा निधी थांबविण्याची मागणी क्षीरसागर यांनी केल्याने त्याला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.