शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आकसातूनच आरोप, दिशाभूल थांबवा!

By admin | Updated: July 16, 2015 21:38 IST

किरण कदम यांचे प्रत्युत्तर : विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार जनता दलाला नाही

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहराच्या विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार जनता दलाला नाही. आकसातूनच आमदार हसन मुश्रीफ व ‘राष्ट्रवादी’वर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते नगरसेवक किरण कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.आठवड्यापूर्वी मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत पालिकेतील ‘सत्तांतरा’बाबत टीका-टिप्पणी केली होती. त्यास जनता दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याला राष्ट्रवादीने उत्तर दिले.२००६-११ या कालावधीत स्वाती कोरी यांच्या आघाडीने किती चोख काम केले आहे, हे गडहिंग्लजकरांना माहीत आहे. त्याचे उत्तर म्हणूनच जनतेने ‘राष्ट्रवादी’कडे सत्ता दिली. म्हणूनच मुश्रीफ यांनी शहरासाठी १०० कोटी निधी देण्याचा संकल्प केला. त्याच्या पूर्ततेची धमक त्यांच्यात आहे.गतवेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निधी नसतानाही साडेतीन कोटींची कामे ‘जनता दल-जनसुराज्य’ आघाडीने केली होती. तो पहिल्या वर्षातच भरून काढला. त्यांनी अर्धवट सोडलेली सुधारित नळपाणी पुरवठा योजना पूर्ण केली. लक्ष्मी यात्रेत शहरातील ९० टक्के रस्ते डांबरी केले.तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ५ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर झाला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी ६४ लाख शिल्लक असताना १ कोटी ६३ लाख शिल्लक असल्याचा खोटा आरोप झाला आहे. १० कोटींचा बहुउद्देशीय हॉलचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे तयार आहे, तसेच योग विद्याधामचा एक कोटीचा प्रस्ताव शासकीय मंजुरीसाठी पाठविला आहे.राष्ट्रवादीने सुंदराबाई बिलावरांना दोनवेळा नगरसेवक व उपनगराध्यक्षपदी बसविले. ‘लक्ष्मी’ दर्शनातूनच त्या विरोधकांना सामील झाल्या असतानाही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे कोरी सांगत आहेत. बिलावरांनी त्यांना वटमुखत्यारपत्र दिले आहे का? असा सवालही कदम यांनी केला. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, गटनेते रामदास कुराडे व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘चौकशी’ला सामोरे जाण्यास तयारघनकचरा प्रकल्पासाठी ४३ लाखांची मशिनरी रीतसर मंजुरीनेच बसविली आहे. तरीदेखील विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे. सहा महिने वीजकनेक्शन अभावी व त्यानंतर पावसाळ्यामुळे मशिनरी बंद आहे. कचऱ्यावर प्रक्रियेचा हा राज्यातील पहिला यशस्वी प्रकल्प आहे. त्याबाबतच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असेही कदम यांनी स्पष्ट केले.‘मीटर’चे श्रेय लाटण्याचा प्रयत्न२०१० मध्ये नागरिकांनी स्व:खर्चाने नळांना मीटर बसवून घ्यावीत अशी सूचना कोरी यांनीच पालिकेच्या सभेत केली होती. आम्ही सत्तेवर आल्यानंतर मीटर मोफत बसविण्याचा ठराव केला, त्यासाठी १३ व्या वित्त आयोगातून एक कोटीहून अधिक रक्कम ठेवली आहे. मात्र, मोफत मीटरची घोषणा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत, असा आरोप कदम यांनी केला.