शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

रामानंदनगर ओढ्यालगत 'आप'चा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST

कोल्हापूर : रामानंदनगर परिसरातील ओढ्याचे पाणी घरांमध्ये शिरत असून महानगरपालिका प्रशासनाने त्याचा काहीच बंदोबस्त न केल्यामुळे सोमवारी 'आप'ने ...

कोल्हापूर : रामानंदनगर परिसरातील ओढ्याचे पाणी घरांमध्ये शिरत असून महानगरपालिका प्रशासनाने त्याचा काहीच बंदोबस्त न केल्यामुळे सोमवारी 'आप'ने केला रास्ता रोको केला. येत्या १५ दिवसांत प्रश्न सोडविला नाही तर ओढ्यातील पाणी घेऊन महापालिकेवर बादली मोर्चा काढू, असा इशारा 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिला.

रामानंदनगरमधील जाधव पार्क येथील नाल्यात असलेल्या बंधाऱ्यामुळे दरवर्षी येथील आजूबाजूच्या २५० घरांमध्ये पुराचे पाणी शिरते तसेच नाल्यात असलेल्या गुंजन पॅराडाईज या अपार्टमेंटच्या अनधिकृत बांधकामामुळे पाणी योग्य पद्धतीने निचरा होत नाही. जाधव पार्कमागील नाल्यातील बंधारा हटवून नाल्यातील पाण्याला वाट मोकळी करून दिल्यास पुराचे पाणी घरांमध्ये शिरणार नाही. त्यामुळे बंधारा हटवून पाण्यास वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत होती.

गुंजन पॅराडाईज अपार्टमेंटने अनधिकृत बांधकाम करून भिंत बांधली आहे. यासंबंधी आयुक्तांचे आदेश असूनदेखील भिंत हटविली गेलेली नाही. संबंधित भिंत त्वरित हटवून नाल्यातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी आयुक्तांनी अतिक्रमणस्थळी भेट देऊन भिंत पाडण्याचे आदेश दिले होते परंतु यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे आज परिसरातील नागरिकांना घेऊन 'आप'ने रामानंदनगर येथील पुलावर रास्ता रोको केला.

सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या रास्ता रोकोची दखल घेत महापालिकेचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. संबंधित अतिक्रमणावर कारवाई करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, राज कोरगावकर, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, अमरजा पाटील, अश्विनी गुरव, उज्ज्वला भोसले, प्रेम बनगे, तुषार पाटील, व्यंकटेश दासार, सतीश भाले, आदम शेख, रविराज पाटील, गिरीश पाटील, विशाल वठारे, राकेश गायकवाड, विजय भोसले, विजय हेगडे, महेश घोलपे उपस्थित होते.

फोटो क्रमांक - १९०७२०२१-कोल-रामानंदनगर

ओळ - कोल्हापुरातील रामानंदनगर येथील ओढ्याचे पाणी घरांमध्ये शिरत असून महानगरपालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्यामुळे सोमवारी 'आप'ने केला रास्ता रोको केला.