शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

अद्याप २० हजार टन ऊस शिवारात उभा

By admin | Updated: February 2, 2015 00:05 IST

पेरणोलीत उसाची उचल कधी? : पाच-सहा वर्षांत सातत्याने या विभागावर अन्याय

कृष्णा सावंत - पेरणोली -फेब्रुवारी चालू झाला तरी अद्याप निम्म्यावर उसाची उचल न झाल्याने पेरणोली (ता. आजरा) येथील परिसरातील उसाची उचल कधी होणार, अशी विचारणा शेतकऱ्यांमधून होत आहे.पेरणोलीसह साळगाव, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, कुरकुंदे, आदी गावांत उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आजरा तालुका हा मुबलक प्रमाणात असलेला उसाचा मोठा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांत सातत्याने या विभागावर उचलीच्या संदर्भात अन्याय होत आहे.आजरा कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण करण्यासाठी व गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अन्य तालुक्यात टोळ्या असल्या, तरी तालुक्यातील ज्या भागात उसाचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात टोळ्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. मात्र, तसे न होता ज्या कारखाना सेंटरमध्ये उसाचे प्रमाण कमी आहे, त्या सेंटरपेक्षा जास्त ऊस उपलब्ध असलेल्या सेंटरमध्ये टोळ्यांचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.सुलगावमध्ये १५०० टन, तर आजऱ्यात ३ ते ४ हजार टन ऊस आहे. मात्र, या दोन्ही गावांत एकूण सहा टोळ्या कार्यरत आहेत. पेरणोली सेंटरला २३ हजार टनांपेक्षा अधिक ऊस उपलब्ध असताना केवळ सहाच टोळ्या आहेत. त्यात पेरणोलीमध्ये तीन व साळगावात तीन टोळ्या आहेत. कोरीवडे, देवकांडगाव, हरपवडे, कुरकुंदे या ऊस उपलब्ध असलेल्या ठिकाणी एकही टोळी नसल्याने कारखान्याच्या प्रशासनाविषयी नाराजी व्यक्तकरण्यात येत आहे.ज्यांचा ऊस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गेला आहे, त्यांची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तोडीची नोंद पेरणोली सेंटरमध्ये आहे. त्यामुळे क्रमपाळीत गोंधळ झाला आहे.ज्यांनी गेल्या पाच वर्षांत अन्य कारखान्यांना ऊस पाठविला आहे, अशा लोकांचा ऊस अगोदर जातो. ज्यांनी प्रामाणिकपणे दराचा विचार न करता आजरा कारखान्यालाच ऊस पाठविला, त्यांना क्रमपाळी दाखवली जाते. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे पेरणोलीसह कुरकुंदे, कोरीवडे, देवकांडगावात जादा टोळ्यांच्या मागणीचा जोर वाढत आहे.उसाची उपलब्धता लक्षात घेता टोळ्या वाढविण्यासाठी नियोजन सुरू आहे. एक ते दोन दिवसांत आणखी टोळ्या पाठवून देऊ.- विष्णुपंत केसरकर, अध्यक्ष, आजरा साखर कारखाना