शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अद्याप २० हजार टन ऊस शिवारात उभा

By admin | Updated: February 2, 2015 00:05 IST

पेरणोलीत उसाची उचल कधी? : पाच-सहा वर्षांत सातत्याने या विभागावर अन्याय

कृष्णा सावंत - पेरणोली -फेब्रुवारी चालू झाला तरी अद्याप निम्म्यावर उसाची उचल न झाल्याने पेरणोली (ता. आजरा) येथील परिसरातील उसाची उचल कधी होणार, अशी विचारणा शेतकऱ्यांमधून होत आहे.पेरणोलीसह साळगाव, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, कुरकुंदे, आदी गावांत उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आजरा तालुका हा मुबलक प्रमाणात असलेला उसाचा मोठा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांत सातत्याने या विभागावर उचलीच्या संदर्भात अन्याय होत आहे.आजरा कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण करण्यासाठी व गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अन्य तालुक्यात टोळ्या असल्या, तरी तालुक्यातील ज्या भागात उसाचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात टोळ्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. मात्र, तसे न होता ज्या कारखाना सेंटरमध्ये उसाचे प्रमाण कमी आहे, त्या सेंटरपेक्षा जास्त ऊस उपलब्ध असलेल्या सेंटरमध्ये टोळ्यांचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.सुलगावमध्ये १५०० टन, तर आजऱ्यात ३ ते ४ हजार टन ऊस आहे. मात्र, या दोन्ही गावांत एकूण सहा टोळ्या कार्यरत आहेत. पेरणोली सेंटरला २३ हजार टनांपेक्षा अधिक ऊस उपलब्ध असताना केवळ सहाच टोळ्या आहेत. त्यात पेरणोलीमध्ये तीन व साळगावात तीन टोळ्या आहेत. कोरीवडे, देवकांडगाव, हरपवडे, कुरकुंदे या ऊस उपलब्ध असलेल्या ठिकाणी एकही टोळी नसल्याने कारखान्याच्या प्रशासनाविषयी नाराजी व्यक्तकरण्यात येत आहे.ज्यांचा ऊस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गेला आहे, त्यांची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तोडीची नोंद पेरणोली सेंटरमध्ये आहे. त्यामुळे क्रमपाळीत गोंधळ झाला आहे.ज्यांनी गेल्या पाच वर्षांत अन्य कारखान्यांना ऊस पाठविला आहे, अशा लोकांचा ऊस अगोदर जातो. ज्यांनी प्रामाणिकपणे दराचा विचार न करता आजरा कारखान्यालाच ऊस पाठविला, त्यांना क्रमपाळी दाखवली जाते. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे पेरणोलीसह कुरकुंदे, कोरीवडे, देवकांडगावात जादा टोळ्यांच्या मागणीचा जोर वाढत आहे.उसाची उपलब्धता लक्षात घेता टोळ्या वाढविण्यासाठी नियोजन सुरू आहे. एक ते दोन दिवसांत आणखी टोळ्या पाठवून देऊ.- विष्णुपंत केसरकर, अध्यक्ष, आजरा साखर कारखाना