शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

अद्याप ५०० रोजंदारी कर्मचारी अधांतरीच

By admin | Updated: November 5, 2014 00:30 IST

न्याय देण्याची मागणी : शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चेची शक्यता

संतोष पाटील - कोल्हापूर -न्यायालयाच्या दणक्यामुळे महापालिका प्रशासनाने १५३ कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची पत्रे दिली. ३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मनपा प्रशासनावर विश्वास ठेवून ३५०हून अधिक रोजंदारी कर्मचारी न्यायालयात गेले नाहीत. आता या सर्वच ५०० पेक्षा अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रशासन कधी न्याय देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिका कर्मचारी संघाने ३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या, या मागणीसाठी २८ जून २००४ रोजी कामगार न्यायालयात दाद मागितली होती. २ फेबु्रवारी २०११ रोजी कामगार न्यायालयाने ३१४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश महापालिकेला दिले. या निकालाविरोधात उच्च न्यायालयातील महापालिकेचा दावा १० एप्रिल २०१२ रोजी फेटाळला गेला. ३१४ पैकी अद्याप १५३ कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले. कामगार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २००४ पासूनचा वेतनफरक देऊन निवृत्तिवेतन योजनेसह कायम आदेश द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आर्थिक भार सोसणार नसल्याने आयुक्तांनी फेटाळली होती. तत्कालीन महापौर सुनीता राऊत यांनी मध्यस्थी करून ५ फेब्रुवारी २०१४ रोजी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेकडे १४ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या १५३ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. या सर्व कर्मचाऱ्यांना २०११ पासूनच्या फरकाची रक्कम देऊ न सोमवारी (दि. ३) नेमणूकपत्रे देण्यात आली. या निर्णयाच्या आधारे इतरही रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी समितीच्या निर्णयाच्या आधारे न्यायालयात कायम करण्याबाबत आदेश आणणे सोपे होणार आहे. या दृष्टीनेही इतर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, प्रशासनावर विश्वास ठेवून न्यायालयात न गेलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शुक्रवारच्या सभेत चर्चा होणारन्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेत असतानाच २००० सालापूर्वी सेवेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना हाच न्याय लावत कायम करण्याचा निर्णय २८ जुलै २०१४ च्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. आता शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या उर्वरित रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचा विषय पुन्हा चर्चेसाठी घेतला आहे. मनपाची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्न करू. - राजेश लाटकर, गटनेता