शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

अद्याप ५०० रोजंदारी कर्मचारी अधांतरीच

By admin | Updated: November 5, 2014 00:30 IST

न्याय देण्याची मागणी : शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चेची शक्यता

संतोष पाटील - कोल्हापूर -न्यायालयाच्या दणक्यामुळे महापालिका प्रशासनाने १५३ कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची पत्रे दिली. ३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मनपा प्रशासनावर विश्वास ठेवून ३५०हून अधिक रोजंदारी कर्मचारी न्यायालयात गेले नाहीत. आता या सर्वच ५०० पेक्षा अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रशासन कधी न्याय देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिका कर्मचारी संघाने ३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या, या मागणीसाठी २८ जून २००४ रोजी कामगार न्यायालयात दाद मागितली होती. २ फेबु्रवारी २०११ रोजी कामगार न्यायालयाने ३१४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश महापालिकेला दिले. या निकालाविरोधात उच्च न्यायालयातील महापालिकेचा दावा १० एप्रिल २०१२ रोजी फेटाळला गेला. ३१४ पैकी अद्याप १५३ कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले. कामगार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २००४ पासूनचा वेतनफरक देऊन निवृत्तिवेतन योजनेसह कायम आदेश द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आर्थिक भार सोसणार नसल्याने आयुक्तांनी फेटाळली होती. तत्कालीन महापौर सुनीता राऊत यांनी मध्यस्थी करून ५ फेब्रुवारी २०१४ रोजी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेकडे १४ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या १५३ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. या सर्व कर्मचाऱ्यांना २०११ पासूनच्या फरकाची रक्कम देऊ न सोमवारी (दि. ३) नेमणूकपत्रे देण्यात आली. या निर्णयाच्या आधारे इतरही रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी समितीच्या निर्णयाच्या आधारे न्यायालयात कायम करण्याबाबत आदेश आणणे सोपे होणार आहे. या दृष्टीनेही इतर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, प्रशासनावर विश्वास ठेवून न्यायालयात न गेलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शुक्रवारच्या सभेत चर्चा होणारन्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेत असतानाच २००० सालापूर्वी सेवेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना हाच न्याय लावत कायम करण्याचा निर्णय २८ जुलै २०१४ च्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. आता शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या उर्वरित रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचा विषय पुन्हा चर्चेसाठी घेतला आहे. मनपाची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्न करू. - राजेश लाटकर, गटनेता