शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पावले पुन्हा वळली घराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची पावले आता पुन्हा घराच्या दिशेने वळली आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी ...

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची पावले आता पुन्हा घराच्या दिशेने वळली आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी ओसरलेल्या तालुक्यातील गावागावांमधील लोक आता आपल्या घरी परतू लागले आहेत. कोल्हापूर शहरासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांमधील नागरिकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. शिरोळ आणि हातकणंगले भागातील नागरिकांना मात्र अजून पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागणार आहे.

जिल्ह्यात २० तारखेपासून पावसाने थैमान सुरू केले. २१ ते २३ तारखेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर करावे लागते. कोल्हापूर शहरातील सुतारमळा, नागाळा पार्क, शाहुपुरी तर करवीरमधील चिखली आंबेवाडी, आरे, तसेच सर्व तालुक्यातील ३८८ गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाखांवर नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. चिखली आंबेवाडी येथील नागरिक कल्याणी हॉल, शाळेत निवाऱ्याला थांबले आहेत. याशिवाय पूरबाधित झालेले काही नागरिक मुस्लीम बोर्डिंग, शाहू सांस्कृतिक हॉल अशा ठिकाणी वास्तव्यास आहेत. बहुतांशी नागरिकांनी हॉटेल आणि नातेवाइकांकडेच जाणे पसंत केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे आणि राधानगरी धरणाचे तीन दरवाजेदेखील बंद झाल्याने पुराचे पाणी आता बऱ्यापैकी ओसरले आहे. त्यामुळे चार दिवस पाण्याने वेढलेले शहरातील रस्ते पुन्हा खुले झाले आहेत, दुसरीकडे आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांमधील नागरिक आपआपल्या घरी जात आहेत.

---

पूरबाधित गावे:- ३८८

पूर्णतः बाधित- ३४

अंशतः बाधित- ३५४

स्थलांतरित कुटुंब संख्या : २९ हजार १५७

स्थलांतरित नागरिक : १ लाख ४५ हजार ९३०

नातेवाइकांकडे : १ लाख २८ हजार ८३८

निवारा कक्षेत - १६ हजार ९९७

कोविड रुग्ण : १४६

स्थलांतरीत जनावरे- ५४ हजार ९४९

--

चिखली, आंबेवाडी, शिरोळ, हातकणंगले अजून पाण्यात

सध्या पूर ओसरत असला तरी अजून चिखली, आंबेवाडी येथील घरांमध्ये पाणी आहे. कल्याणी हाॅल व शाळेत जवळपास १६० लोक राहत आहे, १५० लोक पै-पाहुण्यांच्या घरी गेले आहेत. कोल्हापूरमधील पुराचे पाणी पुढे शिरोळ, हातकणंगलेला जात असल्याने तेथील परिस्थिती अजून जैसे थे असल्याने या भागातील नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत आणखी २-३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

---

पुढील आठवड्यात पुन्हा पावसाचा इशारा

सध्या पाऊस कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुढील आठवड्यात पुन्हा मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी छावणीतच राहावे असे आवाहन केले आहे. मात्र एवढे दिवस छावणीत, पाहुण्यांकडे राहणे शक्य नाही. गावाकडे आपल्या घरादाराला सोडून आलेल्या नागरिकांना परतीचे वेध लागले आहेत.

----