शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पावले पुन्हा वळली घराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची पावले आता पुन्हा घराच्या दिशेने वळली आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी ...

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची पावले आता पुन्हा घराच्या दिशेने वळली आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी ओसरलेल्या तालुक्यातील गावागावांमधील लोक आता आपल्या घरी परतू लागले आहेत. कोल्हापूर शहरासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांमधील नागरिकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. शिरोळ आणि हातकणंगले भागातील नागरिकांना मात्र अजून पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागणार आहे.

जिल्ह्यात २० तारखेपासून पावसाने थैमान सुरू केले. २१ ते २३ तारखेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर करावे लागते. कोल्हापूर शहरातील सुतारमळा, नागाळा पार्क, शाहुपुरी तर करवीरमधील चिखली आंबेवाडी, आरे, तसेच सर्व तालुक्यातील ३८८ गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाखांवर नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. चिखली आंबेवाडी येथील नागरिक कल्याणी हॉल, शाळेत निवाऱ्याला थांबले आहेत. याशिवाय पूरबाधित झालेले काही नागरिक मुस्लीम बोर्डिंग, शाहू सांस्कृतिक हॉल अशा ठिकाणी वास्तव्यास आहेत. बहुतांशी नागरिकांनी हॉटेल आणि नातेवाइकांकडेच जाणे पसंत केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे आणि राधानगरी धरणाचे तीन दरवाजेदेखील बंद झाल्याने पुराचे पाणी आता बऱ्यापैकी ओसरले आहे. त्यामुळे चार दिवस पाण्याने वेढलेले शहरातील रस्ते पुन्हा खुले झाले आहेत, दुसरीकडे आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांमधील नागरिक आपआपल्या घरी जात आहेत.

---

पूरबाधित गावे:- ३८८

पूर्णतः बाधित- ३४

अंशतः बाधित- ३५४

स्थलांतरित कुटुंब संख्या : २९ हजार १५७

स्थलांतरित नागरिक : १ लाख ४५ हजार ९३०

नातेवाइकांकडे : १ लाख २८ हजार ८३८

निवारा कक्षेत - १६ हजार ९९७

कोविड रुग्ण : १४६

स्थलांतरीत जनावरे- ५४ हजार ९४९

--

चिखली, आंबेवाडी, शिरोळ, हातकणंगले अजून पाण्यात

सध्या पूर ओसरत असला तरी अजून चिखली, आंबेवाडी येथील घरांमध्ये पाणी आहे. कल्याणी हाॅल व शाळेत जवळपास १६० लोक राहत आहे, १५० लोक पै-पाहुण्यांच्या घरी गेले आहेत. कोल्हापूरमधील पुराचे पाणी पुढे शिरोळ, हातकणंगलेला जात असल्याने तेथील परिस्थिती अजून जैसे थे असल्याने या भागातील नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत आणखी २-३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

---

पुढील आठवड्यात पुन्हा पावसाचा इशारा

सध्या पाऊस कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुढील आठवड्यात पुन्हा मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी छावणीतच राहावे असे आवाहन केले आहे. मात्र एवढे दिवस छावणीत, पाहुण्यांकडे राहणे शक्य नाही. गावाकडे आपल्या घरादाराला सोडून आलेल्या नागरिकांना परतीचे वेध लागले आहेत.

----