शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
4
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
5
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
6
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
7
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
8
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
9
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
10
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
12
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
13
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
14
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
15
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
16
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
17
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
18
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
19
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
20
Scam Alert: वाहन चालकांनो, ‘RTO’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
Daily Top 2Weekly Top 5

‘सुकाणू’ नव्हे सुकलेली समिती : सदाभाऊ खोत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:51 IST

 कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्दे कोणी म्हणते म्हणून नव्हे तर साखरेच्या भावावरच उसाचा दर‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीकाजिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार ऊस दराबाबत लवकरच बैठकयोग्य तोडगा न निघाल्यास संघर्ष

कोल्हापूर , दि. १८ :  कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री खोत यांनी सुकाणू समितीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका केली.

खोत म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याबाबतचा ‘शब्द’ पाळला आहे. एकराची अट नाहीच सरसकट दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ होणार आहे, पण सुकाणू समितीला ते मान्य नसल्याची चर्चा आहे.

या समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सरकार आहेत. त्यांनी तिथे कर्जमाफी करावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे. तिथे दमडीही दिलेली नाही, काही न करता उगीच टीका करायची, डोळ्यावर काळा चष्मा घातलेल्यांना उजेड कसा दिसणार. कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायला सुकाणू समिती सरकार नसल्याची टीकाही त्यांनी केली.

ज्या कारखान्यांनी अंतिम ऊस बिले दिलेली नाहीत, त्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही. त्यामुळे अंतिम बिलाचा प्रस्ताव त्यांना सादर करावाच लागेल. यंदा देशाला जेवढी साखरेची गरज आहे, तेवढेच उत्पादन होणार आहे, त्यात साखरेचे दर सध्या तरी चांगले असल्याने यंदा एफआरपीपेक्षा जादा पैसे उत्पादकांना मिळतील असे अपेक्षित आहे.

ऊसदर कोणी मागतो म्हणून नव्हे तर साखरेचा बाजारातील भावावर मिळतो. मी म्हणेल तेवढा दर द्यायचा म्हटला तर कारखान्यांचे काय होईल, हे सगळ्यांना माहिती असल्याची टीकाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली.

ऊस दराबाबत लवकरच बैठकमहाराष्ट्रतील ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी तत्पूर्वी साखर कारखानदार, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.

योग्य तोडगा न निघाल्यास संघर्षऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहील; पण योग्य तोडगा निघाला नाही तर रयत संघटना संघर्ष करण्यास रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी दिला.