शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

‘सुकाणू’ नव्हे सुकलेली समिती : सदाभाऊ खोत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:51 IST

 कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्दे कोणी म्हणते म्हणून नव्हे तर साखरेच्या भावावरच उसाचा दर‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीकाजिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार ऊस दराबाबत लवकरच बैठकयोग्य तोडगा न निघाल्यास संघर्ष

कोल्हापूर , दि. १८ :  कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री खोत यांनी सुकाणू समितीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका केली.

खोत म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याबाबतचा ‘शब्द’ पाळला आहे. एकराची अट नाहीच सरसकट दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ होणार आहे, पण सुकाणू समितीला ते मान्य नसल्याची चर्चा आहे.

या समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सरकार आहेत. त्यांनी तिथे कर्जमाफी करावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे. तिथे दमडीही दिलेली नाही, काही न करता उगीच टीका करायची, डोळ्यावर काळा चष्मा घातलेल्यांना उजेड कसा दिसणार. कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायला सुकाणू समिती सरकार नसल्याची टीकाही त्यांनी केली.

ज्या कारखान्यांनी अंतिम ऊस बिले दिलेली नाहीत, त्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही. त्यामुळे अंतिम बिलाचा प्रस्ताव त्यांना सादर करावाच लागेल. यंदा देशाला जेवढी साखरेची गरज आहे, तेवढेच उत्पादन होणार आहे, त्यात साखरेचे दर सध्या तरी चांगले असल्याने यंदा एफआरपीपेक्षा जादा पैसे उत्पादकांना मिळतील असे अपेक्षित आहे.

ऊसदर कोणी मागतो म्हणून नव्हे तर साखरेचा बाजारातील भावावर मिळतो. मी म्हणेल तेवढा दर द्यायचा म्हटला तर कारखान्यांचे काय होईल, हे सगळ्यांना माहिती असल्याची टीकाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली.

ऊस दराबाबत लवकरच बैठकमहाराष्ट्रतील ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी तत्पूर्वी साखर कारखानदार, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.

योग्य तोडगा न निघाल्यास संघर्षऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहील; पण योग्य तोडगा निघाला नाही तर रयत संघटना संघर्ष करण्यास रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी दिला.