शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘सुकाणू’ नव्हे सुकलेली समिती : सदाभाऊ खोत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:51 IST

 कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्दे कोणी म्हणते म्हणून नव्हे तर साखरेच्या भावावरच उसाचा दर‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीकाजिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार ऊस दराबाबत लवकरच बैठकयोग्य तोडगा न निघाल्यास संघर्ष

कोल्हापूर , दि. १८ :  कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री खोत यांनी सुकाणू समितीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका केली.

खोत म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याबाबतचा ‘शब्द’ पाळला आहे. एकराची अट नाहीच सरसकट दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ होणार आहे, पण सुकाणू समितीला ते मान्य नसल्याची चर्चा आहे.

या समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सरकार आहेत. त्यांनी तिथे कर्जमाफी करावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे. तिथे दमडीही दिलेली नाही, काही न करता उगीच टीका करायची, डोळ्यावर काळा चष्मा घातलेल्यांना उजेड कसा दिसणार. कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायला सुकाणू समिती सरकार नसल्याची टीकाही त्यांनी केली.

ज्या कारखान्यांनी अंतिम ऊस बिले दिलेली नाहीत, त्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही. त्यामुळे अंतिम बिलाचा प्रस्ताव त्यांना सादर करावाच लागेल. यंदा देशाला जेवढी साखरेची गरज आहे, तेवढेच उत्पादन होणार आहे, त्यात साखरेचे दर सध्या तरी चांगले असल्याने यंदा एफआरपीपेक्षा जादा पैसे उत्पादकांना मिळतील असे अपेक्षित आहे.

ऊसदर कोणी मागतो म्हणून नव्हे तर साखरेचा बाजारातील भावावर मिळतो. मी म्हणेल तेवढा दर द्यायचा म्हटला तर कारखान्यांचे काय होईल, हे सगळ्यांना माहिती असल्याची टीकाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली.

ऊस दराबाबत लवकरच बैठकमहाराष्ट्रतील ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी तत्पूर्वी साखर कारखानदार, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.

योग्य तोडगा न निघाल्यास संघर्षऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहील; पण योग्य तोडगा निघाला नाही तर रयत संघटना संघर्ष करण्यास रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी दिला.