शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पिंपळगाव येथील नागरिकांचे आमदार आबिटकर यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

पिंपळगाव, ता. भुदरगड येथील ४४ बेघरांना घरे देण्यासाठी गावाच्या नजीक असलेल्या गायरानातील जमिनीवर प्लॉट पाडण्यात आले. शासनाच्या महाराष्ट्र जमीन ...

पिंपळगाव, ता. भुदरगड येथील ४४ बेघरांना घरे देण्यासाठी गावाच्या नजीक असलेल्या गायरानातील जमिनीवर प्लॉट पाडण्यात आले. शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत शासकीय योजनेमधून सन १९९०मध्ये गावच्या गायरानमधील जागेवर प्लॉट पाडून जागा देण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार, मंडल अधिकारी यांनी गावाशेजारील गायरान असलेल्या गट नं. १९२ मधील जागेत रितसर ४४ प्लॉट मंजूर करून वाटप करण्यात आले. त्यावेळी प्लॉट मंजूर झालेल्या ४४ जणांकडून शासकीय किंमत म्हणून प्रत्येकी चारशे रुपयेप्रमाणे पैसे जमा करून त्याची रीतसर पावतीही देण्यात आली. तेव्हा प्लॉटधारकांना पाणी, दिवाबत्ती यांची सोय करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे ग्रामपंचायतकडूनही पैसे जमा करून घेतले आहेत. त्यावेळी एका ग्रामस्थाने आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निकाल काय लागेल? या भीतीपोटी अनेकांनी प्लॉट मंजूर होऊनही येथे घरे बांधणे टाळले. यातील आठ लाभार्थींनीच घरे बांधली. त्यांची घरे ग्रामपंचायतीकडून नावावर झालीत. उर्वरित ३६ जणांनी घरे बांधलेली नाहीत. आता न्यायालयाचा निकाल या प्लॉटधारकांच्या बाजूने लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मंजूर प्लॉट सातबारा पत्रकी नोंद होऊन कब्जापट्टी मिळावी याबाबत गेली दोन वर्षांपासून प्लॉटधारकांकडून महसूल विभागाकडे रितसर पाठपुरावा करण्यात येत आहे. सर्व प्लॉटधारकांनी आमदार आबिटकर यांची भेट घेऊन हा विषय मार्गस्थ लावण्याचे निवेदन देऊन मागणी केली. अनेक वर्षे रेंगाळत पडलेला हा विषय मार्गस्थ होणे गरजेचे आहे. याकामी लवकरच प्रांताधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी बोलताना सांगितले.

यावेळी राजाराम सुतार, बाळासो कळसकर, सुधाकर पलाने, तुकाराम सुतार, केरबा घुरे, पांडुरंग पाटील, विठोबा पाटील, सिद्धार्थ कांबळे, बाळासो पंडे, शिवाजी खतकर, शिवाजी कुंभार, धनाजी टेंबुगडे, राजेंद्र मोरे, वैभव खतकर आदी उपस्थित होते.