शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

औद्योगिक सुरक्षेनिमित्त राज्यस्तरीय रॅली

By admin | Updated: March 5, 2016 00:36 IST

बुधवारी चिपळुणात : अडीच लाख कामगार सहभागी

कोल्हापूर : शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे (कामगार विभाग) राज्यस्तरीय औद्योगिक सुरक्षा रॅली काढण्यात येत आहे. नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून शुक्रवारी सुरू झाली. १२ मार्चपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांतून ही रॅली जाणार आहे.कारखाने अधिनियम १९४८ या कायद्याच्या अंमलबजावणीस यावर्षी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून राज्य शासनाचा औद्योगिक सुरक्षा विभाग, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, विदर्भ अ‍ॅक्शन सेंटर व दी सेफ्टी कॉन्फिडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने ही रॅली काढण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे सहसंचालक राजेंद्र खडामकर यांनी दिली. ही सुरक्षेची मशाल नागपूर, अकोला, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड विभागांतून जाणार आहे. प्रथमच आयोजिलेल्या रॅलीत राज्यभरातील सुमारे अडीच लाख कामगार सहभागी होत आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. बुधवारी (दि. ९) चिपळूण येथे सुरक्षा मशालीचे आगमन होणार आहे. तिथे रॅली काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील कामगार, अधिकारी सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले कामगार, सुरक्षा अधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे.औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या रॅलीच्या माध्यमातून सुरक्षेची जाणीव वृद्धिंगत होण्याबरोबरच व्यवस्थापन व कामगार यांच्या प्रयत्नातून सुरक्षेचा संदेश पोहोचण्यास मदत होईल.- राजेंद्र खडामकर, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर विभाग