शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

राज्यस्तरीय पदांची तहान जिल्हास्तरीय पदांवर

By admin | Updated: April 22, 2015 00:26 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : पदे नसल्याने बॅँकेच्या संचालकपदासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

अशोक पाटील - इस्लामपूरतब्बल ६३ वर्षांपासून सुरू असलेली सांगली जिल्ह्यातील मंत्रिपदाची परंपरा राज्यातील यंदाच्या सत्ताबदलानंतर खंडित झाली. महामंडळे व अन्य मानाच्या पदांपासूनही जिल्हा वंचितच आहे. त्यामुळे राज्यस्तरीय पदांची ही तहान आता जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना जिल्हा बॅँकेच्या संचालकपदावर भागवावी लागत आहे. आजी-माजी आमदार, माजी मंत्री यांनी त्यासाठीच धडपड सुरू केली आहे. राज्याच्या राजकारणात कधीकाळी दबदबा निर्माण करणारे नेतेही जिल्हा बॅँकेच्या संचालकपदासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, माजी मंत्री एन. डी. पाटील, जयंत पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम, शिवाजीराव नाईक, प्रतीक पाटील यांनी मंत्री म्हणून जिल्ह्याची ही परंपरा अखंडित ठेवली होती. राज्यातील सत्तांतरानंतर सांगली जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. आघाडी काँग्रेसमधील नेत्यांचे अनेक पिढ्यांपासून सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे. सध्या त्यांच्याकडे मंत्रीपद, सत्ता नसल्याने या सर्वांनाच जिल्हा बँकेच्या सत्तेचे वेध लागले आहेत.वसंतदादा पाटील यांनी राज्यस्तरीय राजकारणात पाऊल टाकल्यानंतर कधीच जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थेत लक्ष घातले नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गुलाबराव पाटील, बाजीराव बाळाजी पाटील यांना सलग ११ वर्र्षांची संधी दिली. या काळात जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात होती. अलीकडील काही वर्षांत राज्य पातळीवरील नेत्यांनीही बँकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याने बँकेचा कारभार एकहाती राहिला नाही. त्यामुळे बँक तोट्याच्या दिशेने वाटचाल करीत राहिली. केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. सांगली जिल्ह्यात मात्र आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील, प्रतीक पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या सहकारी संस्था काही अपवाद वगळता सुरळीत सुरू आहेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक या दिग्गज नेत्यांसह इतर तालुक्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या काँग्रेसला तोडीस तोड सहकारी संस्था आहेत.आजची परिस्थिती पाहता मंत्रिपदापासून सांगली जिल्हा पोरका झाला आहे. त्यामुळेच की काय जिल्हा पातळीवरील बँकेच्या निवडणूक रिंगणात आजी, माजी आमदार, माजी मंत्री मोठ्या हिरीरीने उतरले आहेत.भाजप-सेनेच्या नेत्यांची धडपडखासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते यापूर्वी सर्वच पक्षांची चाचपणी करून आलेले आहेत, तर आमदार सुरेश खाडे हे भाजपचे एकनिष्ठ आहेत. त्यांच्याकडे सहकारी संस्थांचे जाळे नाही. अनिल बाबर यांनी आमदार असतानाही बँकेवर निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.