शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय पदांची तहान जिल्हास्तरीय पदांवर

By admin | Updated: April 22, 2015 00:26 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : पदे नसल्याने बॅँकेच्या संचालकपदासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

अशोक पाटील - इस्लामपूरतब्बल ६३ वर्षांपासून सुरू असलेली सांगली जिल्ह्यातील मंत्रिपदाची परंपरा राज्यातील यंदाच्या सत्ताबदलानंतर खंडित झाली. महामंडळे व अन्य मानाच्या पदांपासूनही जिल्हा वंचितच आहे. त्यामुळे राज्यस्तरीय पदांची ही तहान आता जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना जिल्हा बॅँकेच्या संचालकपदावर भागवावी लागत आहे. आजी-माजी आमदार, माजी मंत्री यांनी त्यासाठीच धडपड सुरू केली आहे. राज्याच्या राजकारणात कधीकाळी दबदबा निर्माण करणारे नेतेही जिल्हा बॅँकेच्या संचालकपदासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, माजी मंत्री एन. डी. पाटील, जयंत पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम, शिवाजीराव नाईक, प्रतीक पाटील यांनी मंत्री म्हणून जिल्ह्याची ही परंपरा अखंडित ठेवली होती. राज्यातील सत्तांतरानंतर सांगली जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. आघाडी काँग्रेसमधील नेत्यांचे अनेक पिढ्यांपासून सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे. सध्या त्यांच्याकडे मंत्रीपद, सत्ता नसल्याने या सर्वांनाच जिल्हा बँकेच्या सत्तेचे वेध लागले आहेत.वसंतदादा पाटील यांनी राज्यस्तरीय राजकारणात पाऊल टाकल्यानंतर कधीच जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थेत लक्ष घातले नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गुलाबराव पाटील, बाजीराव बाळाजी पाटील यांना सलग ११ वर्र्षांची संधी दिली. या काळात जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात होती. अलीकडील काही वर्षांत राज्य पातळीवरील नेत्यांनीही बँकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याने बँकेचा कारभार एकहाती राहिला नाही. त्यामुळे बँक तोट्याच्या दिशेने वाटचाल करीत राहिली. केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. सांगली जिल्ह्यात मात्र आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील, प्रतीक पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या सहकारी संस्था काही अपवाद वगळता सुरळीत सुरू आहेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक या दिग्गज नेत्यांसह इतर तालुक्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या काँग्रेसला तोडीस तोड सहकारी संस्था आहेत.आजची परिस्थिती पाहता मंत्रिपदापासून सांगली जिल्हा पोरका झाला आहे. त्यामुळेच की काय जिल्हा पातळीवरील बँकेच्या निवडणूक रिंगणात आजी, माजी आमदार, माजी मंत्री मोठ्या हिरीरीने उतरले आहेत.भाजप-सेनेच्या नेत्यांची धडपडखासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते यापूर्वी सर्वच पक्षांची चाचपणी करून आलेले आहेत, तर आमदार सुरेश खाडे हे भाजपचे एकनिष्ठ आहेत. त्यांच्याकडे सहकारी संस्थांचे जाळे नाही. अनिल बाबर यांनी आमदार असतानाही बँकेवर निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.