शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

कणकवलीत ११पासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

By admin | Updated: December 19, 2014 23:32 IST

बाजारपेठ मित्रमंडळातर्फे आयोजन : संदेश पारकर यांची माहिती; लाखांची बक्षिसे

कणकवली : बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने प. पू. भालचंद्र महाराजांच्या १११व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ११ ते १८ जानेवारी २०१५ या काळात राज्यस्तरीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येथील मुडेश्वर मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे २७ वे वर्ष असून विजेत्या संघास १ लाख १ हजार १११ रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष व कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य नगरसेवक रूपेश नार्वेकर, सोमनाथ गायकवाड, प्रसाद अंधारी, आदित्य सापळे, गौतम खुडकर, अमित मयेकर, हरेश निखार्गे, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.अंतिम सामन्यासाठी ‘थर्ड अंपायर’ असणारनामवंत क्रिकेटपटूंनाही या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अद्ययावत स्टेडियम बनविण्यात येणार असून खेळाडूंसाठी ड्रींकट्रॉलीची व्यवस्था केली जाईल. १८ जानेवारी रोजी स्पर्धेच्या अंतिम दिवशी खेळविण्यात येणाऱ्या सामन्यांसाठी ‘थर्ड अंपायर’ नियुक्त केले जाणार आहेत. तसेच मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी मोफत लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या ड्रॉमध्ये विजयी होणाऱ्याला मोटारसायकल भेट देण्यात येणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी चिअर्स गर्ल्सही उपस्थित राहणार आहेत.८ षटकांच्या या स्पर्धेतील उपविजेत्या संघास रोख रूपये ५० हजार १११ व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उपांत्य सामन्यातील पराभूत संघांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक सामन्यातील सामनावीरालाही गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक षटकार व चौकारासाठी पारितोषिक देण्याबरोबरच इतर वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी ७ जानेवारीपर्यंत आदित्य सापळे, गौरव हर्णे, मयूर पेडणेकर यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही यावेळी पारकर यांनी केले. (वार्ताहर)संदेश पारकर म्हणाले, क्रिकेट या खेळाला चालना मिळावी, तसेच नवोदित क्रिकेटपटूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन घडविण्यासाठी संधी मिळावी, या उद्देशाने गेली २६ वर्षे ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेच्या २७व्या वर्षी काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ११ जानेवारी रोजी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला नामवंत सिनेकलाकार तसेच राजकीय व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभापूर्वी कणकवली शहरातून भव्य मोटारसायकल रॅली स्पर्धा स्थळापर्यंत काढण्यात येईल. मुंबई, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे आदी भागातून ४० संघ या स्पर्धेत सहभागी होतील.