शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर राज्यात भारी

By admin | Updated: October 17, 2015 00:21 IST

४९९७ कोटी शेतकऱ्यांना अदा : फक्त १२८ कोटी प्रलंबित

कोल्हापूर : गत हंगामातील ‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत ५१२५ कोटी ४९ लाखांपैकी तब्बल ४९९७ कोटी ४९ लाख रुपये (९८.१७ टक्के) शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत. अद्याप कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ८१ कोटी, तर सांगली जिल्ह्यातील ४७ कोटी असे १२८ कोटी प्रलंबित आहेत. साखरेचे दर पडल्याने गत हंगामात एफआरपीचा तिढा निर्माण झाला आहे. कोल्हापूर वगळता एकाही जिल्ह्याने एकरकमी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. साखर कारखान्यांकडे पैसे उपलब्ध न झाल्याने उसाचे पैसे थकले आहेत. दुसरा हंगाम तोंडावर आला असताना सहा-सात महिन्यांपूर्वी तुटलेल्या उसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ कोल्हापूर विभागातील साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे देय रकमेपैकी तब्बल ९८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. गत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ६३ लाख ४४ हजार टन गाळप झाले होते. ‘एफआरपी’प्रमाणे ३३३१ कोटी २५ लाख रुपये रक्कम होते. त्यापैकी ३२५० कोटी २५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झालेले आहेत. पाच साखर कारखान्यांकडे केवळ ८१ कोटी (२.४३ टक्के) देय रक्कम आहे. सांगलीत ७७ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप झाले होते. ‘एफआरपी’प्रमाणे १७९४ कोटी २४ लाख रुपये होते, त्यापैकी १७४७ कोटी २४ लाख रुपये अदा झालेले आहेत. दहा कारखान्यांकडे ४७ कोटी रुपये प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)