शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर राज्यात भारी

By admin | Updated: October 17, 2015 00:21 IST

४९९७ कोटी शेतकऱ्यांना अदा : फक्त १२८ कोटी प्रलंबित

कोल्हापूर : गत हंगामातील ‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत ५१२५ कोटी ४९ लाखांपैकी तब्बल ४९९७ कोटी ४९ लाख रुपये (९८.१७ टक्के) शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत. अद्याप कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ८१ कोटी, तर सांगली जिल्ह्यातील ४७ कोटी असे १२८ कोटी प्रलंबित आहेत. साखरेचे दर पडल्याने गत हंगामात एफआरपीचा तिढा निर्माण झाला आहे. कोल्हापूर वगळता एकाही जिल्ह्याने एकरकमी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. साखर कारखान्यांकडे पैसे उपलब्ध न झाल्याने उसाचे पैसे थकले आहेत. दुसरा हंगाम तोंडावर आला असताना सहा-सात महिन्यांपूर्वी तुटलेल्या उसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ कोल्हापूर विभागातील साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे देय रकमेपैकी तब्बल ९८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. गत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ६३ लाख ४४ हजार टन गाळप झाले होते. ‘एफआरपी’प्रमाणे ३३३१ कोटी २५ लाख रुपये रक्कम होते. त्यापैकी ३२५० कोटी २५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झालेले आहेत. पाच साखर कारखान्यांकडे केवळ ८१ कोटी (२.४३ टक्के) देय रक्कम आहे. सांगलीत ७७ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप झाले होते. ‘एफआरपी’प्रमाणे १७९४ कोटी २४ लाख रुपये होते, त्यापैकी १७४७ कोटी २४ लाख रुपये अदा झालेले आहेत. दहा कारखान्यांकडे ४७ कोटी रुपये प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)