शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

हवाईदल एनसीसीसाठी राज्य शासनाची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:13 IST

कोल्हापूरला हवाई दल (एअर विंग) एनसीसी सुरू करण्यास डायरेक्टर जनरल, एनसीसी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असतानाही, महाराष्ट्र शासन त्याला मंजुरी देत नसल्याने हा प्रस्ताव गेली सहा वर्षे लोंबकळत पडला आहे. त्याबद्दल दादूमामा ट्रस्टचे संस्थापक व माजी वायुसैनिक मुरलीधर देसाई हे सातत्याने पाठपुरावा करीत असूनही त्याकडे कोल्हापूरचे खासदार व अन्य लोकप्रतिनिधीही लक्ष द्यायला तयार नाहीत. एअर कमांडर सुनील कुमार यांनी देसाई यांना १९ जूनला पत्र पाठवून राज्य शासन यासाठी अजिबातच प्रतिसाद देत नसल्याचे कळविले आहे.

ठळक मुद्देहवाईदल एनसीसीसाठी राज्य शासनाची नकारघंटाकोल्हापूरचा प्रस्ताव पडून : लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद नाही

कोल्हापूर : कोल्हापूरला हवाई दल (एअर विंग) एनसीसी सुरू करण्यास डायरेक्टर जनरल, एनसीसी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असतानाही, महाराष्ट्र शासन त्याला मंजुरी देत नसल्याने हा प्रस्ताव गेली सहा वर्षे लोंबकळत पडला आहे. त्याबद्दल दादूमामा ट्रस्टचे संस्थापक व माजी वायुसैनिक मुरलीधर देसाई हे सातत्याने पाठपुरावा करीत असूनही त्याकडे कोल्हापूरचे खासदार व अन्य लोकप्रतिनिधीही लक्ष द्यायला तयार नाहीत. एअर कमांडर सुनील कुमार यांनी देसाई यांना १९ जूनला पत्र पाठवून राज्य शासन यासाठी अजिबातच प्रतिसाद देत नसल्याचे कळविले आहे.कोल्हापूरला एनसीसी ग्रुप हेटक्वार्टर १९६० पासून आहे. त्याअंतर्गत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या या ग्रुप एनसीसीमध्ये आर्मीची आठ युनिट व एक नेव्ही विंग आहे.नेव्ही विंग रत्नागिरीला असून तिचे प्रशिक्षण तिथे दिले जाते. एअर विंग एनसीसी सध्या पुण्यासह मुंबई व नागपूरला आहे. कोल्हापुरात फक्त प्रायव्हेट हायस्कूलमध्येच ही व्यवस्था आहे; परंतु ती अपुरी आहे. येथे एअर विंग एनसीसी नसल्याने या विभागातील विद्यार्थ्यांना एअर फोर्ससंबंधी पुरेशी माहिती मिळत नाही. उत्सुकता आणि क्षमता असल्याने महाविद्यालयांत चौकशी करूनही त्याचे काहीच प्राथमिक ज्ञान उपलब्ध होत नाही. त्यामुळे या पाच जिल्ह्यांतून एअर फोर्समध्ये फारशी भरती होत नाही.

देसाई यांनी यासंबंधी २०१५ पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार वेळा पत्रे पाठविली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही चार-पाच वेळा भेट घेतली; परंतु त्यांना फारसा कोणी प्रतिसाद देत नाही. त्यांनी नवी दिल्लीतील डीजीएनसीसी कार्यालयाकडेही सातत्याने पत्रव्यवहार केला; परंतु जोपर्यंत राज्य शासन या प्रस्तावास मंजुरी देत नाही तोपर्यंत ही एनसीसी होऊ शकत नाही.

कोल्हापुरात एनसीसीची हवाई दलाची शाखा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना या क्षेत्राबद्दल माहिती मिळेल; परंतु राज्य सरकार याबाबत फारच उदासीन असल्याचा अनुभव गेली पाच-सहा वर्षे येत आहे.- मुरलीधर देसाईमाजी वायुसैनिक, कोल्हापूर 

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलkolhapurकोल्हापूर