शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

हवाईदल एनसीसीसाठी राज्य शासनाची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:13 IST

कोल्हापूरला हवाई दल (एअर विंग) एनसीसी सुरू करण्यास डायरेक्टर जनरल, एनसीसी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असतानाही, महाराष्ट्र शासन त्याला मंजुरी देत नसल्याने हा प्रस्ताव गेली सहा वर्षे लोंबकळत पडला आहे. त्याबद्दल दादूमामा ट्रस्टचे संस्थापक व माजी वायुसैनिक मुरलीधर देसाई हे सातत्याने पाठपुरावा करीत असूनही त्याकडे कोल्हापूरचे खासदार व अन्य लोकप्रतिनिधीही लक्ष द्यायला तयार नाहीत. एअर कमांडर सुनील कुमार यांनी देसाई यांना १९ जूनला पत्र पाठवून राज्य शासन यासाठी अजिबातच प्रतिसाद देत नसल्याचे कळविले आहे.

ठळक मुद्देहवाईदल एनसीसीसाठी राज्य शासनाची नकारघंटाकोल्हापूरचा प्रस्ताव पडून : लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद नाही

कोल्हापूर : कोल्हापूरला हवाई दल (एअर विंग) एनसीसी सुरू करण्यास डायरेक्टर जनरल, एनसीसी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असतानाही, महाराष्ट्र शासन त्याला मंजुरी देत नसल्याने हा प्रस्ताव गेली सहा वर्षे लोंबकळत पडला आहे. त्याबद्दल दादूमामा ट्रस्टचे संस्थापक व माजी वायुसैनिक मुरलीधर देसाई हे सातत्याने पाठपुरावा करीत असूनही त्याकडे कोल्हापूरचे खासदार व अन्य लोकप्रतिनिधीही लक्ष द्यायला तयार नाहीत. एअर कमांडर सुनील कुमार यांनी देसाई यांना १९ जूनला पत्र पाठवून राज्य शासन यासाठी अजिबातच प्रतिसाद देत नसल्याचे कळविले आहे.कोल्हापूरला एनसीसी ग्रुप हेटक्वार्टर १९६० पासून आहे. त्याअंतर्गत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या या ग्रुप एनसीसीमध्ये आर्मीची आठ युनिट व एक नेव्ही विंग आहे.नेव्ही विंग रत्नागिरीला असून तिचे प्रशिक्षण तिथे दिले जाते. एअर विंग एनसीसी सध्या पुण्यासह मुंबई व नागपूरला आहे. कोल्हापुरात फक्त प्रायव्हेट हायस्कूलमध्येच ही व्यवस्था आहे; परंतु ती अपुरी आहे. येथे एअर विंग एनसीसी नसल्याने या विभागातील विद्यार्थ्यांना एअर फोर्ससंबंधी पुरेशी माहिती मिळत नाही. उत्सुकता आणि क्षमता असल्याने महाविद्यालयांत चौकशी करूनही त्याचे काहीच प्राथमिक ज्ञान उपलब्ध होत नाही. त्यामुळे या पाच जिल्ह्यांतून एअर फोर्समध्ये फारशी भरती होत नाही.

देसाई यांनी यासंबंधी २०१५ पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार वेळा पत्रे पाठविली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही चार-पाच वेळा भेट घेतली; परंतु त्यांना फारसा कोणी प्रतिसाद देत नाही. त्यांनी नवी दिल्लीतील डीजीएनसीसी कार्यालयाकडेही सातत्याने पत्रव्यवहार केला; परंतु जोपर्यंत राज्य शासन या प्रस्तावास मंजुरी देत नाही तोपर्यंत ही एनसीसी होऊ शकत नाही.

कोल्हापुरात एनसीसीची हवाई दलाची शाखा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना या क्षेत्राबद्दल माहिती मिळेल; परंतु राज्य सरकार याबाबत फारच उदासीन असल्याचा अनुभव गेली पाच-सहा वर्षे येत आहे.- मुरलीधर देसाईमाजी वायुसैनिक, कोल्हापूर 

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलkolhapurकोल्हापूर