शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

विकासाची हमी राज्य शासनाने घ्यावी

By admin | Updated: June 26, 2014 00:36 IST

गावांना ठोस आश्वासनाची गरज : आठ लाखांचा लोकसंख्येचा टप्पा पूर्ण न झाल्यास केंद्राकडून अनुदानाची खात्री काय?

संतोष पाटील ल्ल क ोल्हापूरहद्दवाढ झाल्यानंतर कररूपाने महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. केंद्राकडून निधी मिळेल, अशी आशा महापालिकेसह नगरसेवक बाळगून आहेत. निधीसाठी हद्दवाढ केली अन् निधी नाही मिळाला, तर हद्दवाढीनंतरच्या विकास कामासाठी निधी कसा उभा करायचा याचे उत्तर आज महापालिकेत कोणाजवळही नाही. त्यामुळे याची हमी राज्य शासनाने घेणे गरजेचे आहे.नागपूर, कल्याण, डोंबिवली, मीरा-भार्इंदर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, लातूर अशा महापालिकांची हद्दवाढ झाल्यानंतर दहा वर्षांत झपाट्याने विकास झाला. लोकसंख्या निकषाचा टप्पा पार केल्यानेच केंद्राकडून निधीचा पाऊस पडला. हद्दवाढ करूनही कोल्हापूरची लोकसंख्या आठ लाखांचा टप्पा ओलांडणार नाही. यामुळे केंद्राच्या योजनेस पात्र होणार नसल्याने निधी मिळण्याची शक्यता कमी आहे. हद्दवाढ झाली आणि विकास झाला नाही किंवा पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत अशी राज्यात एकही महानगरपालिका नाही. या शहरांनी जागतिक बँकेच्या निर्देशानुसार दहा लाख लोकसंख्येचा टप्पा पार केला. बँकेकडून मिळणारा निधी या शहरातील पायाभूत सुविधांवर खर्च करणे केंद्र सरकारलाही शक्य झाले. कोल्हापूर मात्र ही दहा लाख लोकसंख्येची अट पूर्ण करू शकत नसल्याने विकास निधीबाबत राज्य शासनाने हमी घेण्याची गरज आहे.ग्रामीण जनतेच्या मनात हद्दवाढीबाबतीत असलेल्या शंका व भीती दूर करण्याचा अद्याप एकही प्रयत्न झालेला नाही. सर्वच राजकीय पक्षात हद्दवाढीच्या समर्थक व विरोधक आहेत. शहरात राहणारे समर्थन करतात, तर ग्रामीण भागाचे नेतृत्व करणारे त्याच पक्षाचे नेते विरोधाच्या घोषणा देत आहेत. निवडणुकीवर डोळा ठेवून शहरातील जनतेला रिजविण,े तर ग्रामीण भागातील जनतेत विरोधाचे अंगार फुलविण्याचे काम केले जात आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनतेत मोठा गैरसमज आहे, तो दूर करणे गरजेचे आहे. हद्दवाढ कोणावरही न लादता सकारात्मक पद्धतीने विचार करून सर्वानुमते झाली पाहिजे.