शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आजरा साखर कारखान्याच्या हंगामाआधी राजकीय गुऱ्हाळ

By admin | Updated: July 28, 2016 00:55 IST

या सभेकडेच विरोधी दहा संचालकांनी पाठ फिरवित आपला रोष कायम असल्याचे दाखवून दिले.

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा --साखर कारखाना निवडणूक होऊन पहिला गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच सत्तारूढ आघाडी व विरोधकांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली असून, यामुळे सभासदांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कारखान्याचे कारभारीच अशा पद्धतीने वागू लागले तर कारखन्याचे भवितव्य काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आजरा साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. महाआघाडीने काठावरचे बहुमत मिळवित सत्तेची सूत्रे स्वत:कडे ठेवण्यात यश मिळविले.अध्यक्ष निवडीपासूनच सध्याचे सत्तारूढ व विरोधक यांच्यात अंतर्गत वाद सुरू झाले. साखर वाटप करण्यास सरुवात करून महाआघाडीने आचारसंहितेचा भंग केल्याचा बॉम्ब विरोधकांनी टाकला. पाठोपाठ निवडणूक प्रक्रियेचा निकाल सदोष असल्याचे सांगता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तज्ज्ञ संचालक नियुक्तीवेळी या सभेकडेच विरोधी दहा संचालकांनी पाठ फिरवित आपला रोष कायम असल्याचे दाखवून दिले. हीच संधी सत्ताधाऱ्यांना सापडल्याने सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना राजकारणाचे जोडे आता बाजूला ठेवा, असे सांगत निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या सर्व प्रकारात सभासदावर मात्र आता डोक्यावर होत मारून घेण्याची वेळ आली आहे. मुळातच यावर्षी ऊस क्षेत्रात घट झाली आहे.राजकीय साठमारी अशीच चालू राहिल्यास कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेजारील कारखान्यांसमोर ऊस टंचाईचा प्रश्न असल्याने उसाची पळवापळव होणार हेसुद्धा स्पष्ट आहे. आजरा साखर कारखान्यात डिस्टीलरी, सहवीज प्रकल्प सुरू करण्याशिवाय पर्यायही नाही सभासदांनी लोकशाही पद्धतीने सर्वच संचालकांना विश्वास म्हणून पाठविले आहे. अशावेळी संचालक मंडळातील अंतर्गत वाद आता तरी परवडणारे नाहीत हे नक्की.राजकारणामुळे नुकसानराजकीय साठमारी अशीच चालू राहिल्यास केवळ राजकारणामुळे काही ऊस बाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेजारील कारखान्यांसमोर ऊस टंचाईचा प्रश्न असल्याने उसाची पळवापळव होणार हेसुद्धा स्पष्ट आहे.आजरा साखर कारखान्यात डिस्टिलरी, सहवीज प्रकल्प सुरू करण्याशिवाय पर्यायही नाही. सभासदांनी लोकशाही पद्धतीने सर्वच संचालकांना विश्वास म्हणून पाठविले आहे. अशावेळी संचालक मंडळातील अंतर्गत वाद आता तरी परवडणारे नाहीत हे नक्की.