शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
2
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
3
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
5
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
6
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
7
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
8
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
9
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
10
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
11
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
12
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
13
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
14
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
15
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
16
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
17
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
18
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
19
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
20
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेने विकास संस्थांना थेट कर्ज पुरवठा करावा

By admin | Updated: January 2, 2017 01:07 IST

सुभाष देशमुख : राज्य बॅँकेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन

कोल्हापूर : जिल्हा बँका राजकीय गटा-तटांत अडकल्या असून, विकास संस्थांचे भागभांडवल बँकेकडे घेऊन त्यावर अल्पदराने थेट विकास संस्थांना कर्जपुरवठा करावा, अशी सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली.दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. चुकीच्या गोेष्टींमुळे सहकारावरील विश्वास कमी झाला आहे. आगामी काळात हा विश्वास वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत मंत्री देशमुख पुढे म्हणाले, विकास संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जिल्हा बँका गटा-तटात अडकल्याने विकास संस्थांना पर्यायाने शेतकऱ्यांना राज्य बँक चांगला पर्याय आहे. सहकारात निकोप स्पर्धा झाली पाहिजे. राज्य बँक ग्रामीण भागात येत असल्याने विकास संस्थांना आधार मिळणार आहे. बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, जिल्हा बॅँकेचे राजकारण सांभाळण्यासाठीच विकास संस्था, या उद्देशामुळेच संस्था अडचणीत आल्या. हे बदलायचे आहे, राज्य बँकेने विकास संस्थांना मजबूत करण्याचा आराखडा तयार करण्याची सूचना मंत्री देशमुख यांनी केली. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी बँकेचा इतिहास पॉवर पॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. खासदार धनंजय महाडिक, ए. ए. मगदूम, विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक एन. एन. जाधव, एस. बी. शेळके, शाखा व्यवस्थापक प्रमोद कांबळे यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय मंडळाचे सदस्य के. एन. तांबे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)विस्तार करा पण जपून!आर्थिक अरिष्टात सापडलेल्या राज्य बॅँकेला बाहेर काढण्याची जबाबदारी दीड वर्षांपूर्वी प्रशासकीय मंडळाकडे दिली. त्यांनी उत्तम काम करत बॅँकेला प्रगतिपथावर आणली. शाखाविस्तार करून व्यवसाय वाढवा, प्रगतीचा आलेख चढता ठेवा, भविष्यात अडचणी आल्या तर हा आलेख स्थिर राहावा पण त्यापेक्षा खाली येऊ नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.शेतीपूरक व्यवसायाला बळ द्या : चंद्रकांतदादाराज्य बॅँकेने केवळ गृह व वाहन कर्जांत अडकून न पडता शेतीपूरक व्यवसायांना कर्जपुरवठा करून तो बळकट करावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी राज्य बँकेने शेतकरी केंद्रबिंदू मानून वाटचाल करावी, असेही ते म्हणाले. शेतीवर आधारित साखर उद्योग व ‘गोकुळ’सारख्या प्रक्रिया उद्योगामुळे कोल्हापुरात आर्थिक सुबत्ता आली. शेतकऱ्यांनी ‘पीक पॅटर्न’ बदलणे गरजेचे आहे. कच्चा माल जागेवरच खरेदी होतो, हा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण व्हावा, याकरिता प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी राज्य बॅँकेनेच आराखडा तयार करून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणालजिल्हा बँकेची शंभर कोटींची ठेव : जिल्हा बँकेने शंभर कोटींच्या ठेवी राज्य बँकेत जमा केल्या. मंत्री चंद्रकांतदादा पाटील व सुभाष देशमुख यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांना ठेव पावती देण्यात आली. त्याचबरोबर पहिल्या २५ लाखांच्या गृहकर्ज धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले. े.