शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

मराठा आरक्षण रद्दला राज्य, केंद्र सरकारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

भादोले (वार्ताहर ) : महाराष्ट्र राज्य सरकारनं बनविलेल्या मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याला राज्य सरकारबरोबर ...

भादोले (वार्ताहर ) : महाराष्ट्र राज्य सरकारनं बनविलेल्या मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याला राज्य सरकारबरोबर केंद्रातील मोदी सरकारही जबाबदार आहे, असा आरोप भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांनी केला. आरक्षण निकालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय मराठा महासंघाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. दोन्ही सरकारांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात नाराजी पसरली आहे. भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे म्हणाले, मराठा समाजाची अवस्था बिकट झालेली आहे. ज्या शेतीच्या जोरावर मराठा समाज आपला उदरनिर्वाह चालवायचा, त्या शेती व्यवसायात नुकसानीची झळ बसत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे. परंतु मराठा समाजाच्या नावावर सत्ता भोगणारे आमदार, खासदार, मंत्री म्हणून सत्तेत आहेत. पण मराठा समाजाच्या मूळ मुद्द्याकडे कधीही त्यांना वेळ मिळाला नाही व जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही ही मोठी शोकांतिका आहे.

एका समाजाला एक न्याय, तर दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय कसा? इतर राज्यांना ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आलं, मग आपल्या महाराष्ट्र राज्याला का नाही? हा सवालही शिंदे यांनी उपस्थित यावेळी केला. मराठा समाजाबद्दल तळमळ असणाऱ्या तसेच मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व मराठा आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी भारतीय मराठा महासंघाने यावेळी केली.