शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण रद्दला राज्य, केंद्र सरकारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

भादोले (वार्ताहर ) : महाराष्ट्र राज्य सरकारनं बनविलेल्या मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याला राज्य सरकारबरोबर ...

भादोले (वार्ताहर ) : महाराष्ट्र राज्य सरकारनं बनविलेल्या मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याला राज्य सरकारबरोबर केंद्रातील मोदी सरकारही जबाबदार आहे, असा आरोप भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांनी केला. आरक्षण निकालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय मराठा महासंघाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. दोन्ही सरकारांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात नाराजी पसरली आहे. भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे म्हणाले, मराठा समाजाची अवस्था बिकट झालेली आहे. ज्या शेतीच्या जोरावर मराठा समाज आपला उदरनिर्वाह चालवायचा, त्या शेती व्यवसायात नुकसानीची झळ बसत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे. परंतु मराठा समाजाच्या नावावर सत्ता भोगणारे आमदार, खासदार, मंत्री म्हणून सत्तेत आहेत. पण मराठा समाजाच्या मूळ मुद्द्याकडे कधीही त्यांना वेळ मिळाला नाही व जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही ही मोठी शोकांतिका आहे.

एका समाजाला एक न्याय, तर दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय कसा? इतर राज्यांना ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आलं, मग आपल्या महाराष्ट्र राज्याला का नाही? हा सवालही शिंदे यांनी उपस्थित यावेळी केला. मराठा समाजाबद्दल तळमळ असणाऱ्या तसेच मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व मराठा आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी भारतीय मराठा महासंघाने यावेळी केली.