शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

‘जलयुक्त’मधील २० गावांत कामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 00:15 IST

अमित सैनी : पाणी साठविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : जलयुक्त शिवार या अभियानामध्ये २०१६-१७ या वर्षासाठी निवडलेल्या २० गावांमध्ये सात दिवसांत कामांना सुरुवात करण्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी संबंधित यंत्रणांना दिल्या. त्याचबरोबर या अभियानामध्ये गतवर्षी व यावर्षी समाविष्ट असणाऱ्या गावांमध्ये लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होऊन पाणी साठविण्यास मदत होईल, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेऊन नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास संबंधित विभागांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी सैनी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, वन विभागाचे उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील, आदी उपस्थित होते.या अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंत शासनाने मुदतवाढ दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार दोन महिन्यांत बंधारे बांधणे, तलावातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे, वन तलावांची देखभाल, टेकडावरून सलग समतल चर खणणे अशा स्वरूपाची कामे या सर्व विभागांनी पूर्ण करायची आहेत. जेणेकरून जूनपूर्वी ही कामे पूर्ण होतील व पावसाळ्यातील पाणी यामध्ये साचून त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर २०१६-१७ या वर्षासाठी या अभियानासाठी निवडलेल्या २० गावांमध्ये कामे सुरूकरण्यासंदर्भात येत्या सात दिवसांत नियोजन करून कामाला सुरुवात करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. या गावांमध्ये प्राधान्यक्रम हा तलावातील गाळ काढण्यास दिला जाणार आहे. कारण दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार असून, पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठण्यास मदत होईल, या दृष्टीने हे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानातील कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील बैठक १३ एप्रिलला होणार आहे. या बैठकीला महसूल, जिल्हा परिषद, कृषी, जलसंधारण, जलसंपदा, सामाजिक वनीकरण, वन विभाग, आदी विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)अभियानात गावे वाढविण्यास शासनाला विनंतीशासनाकडून गतवर्षी या अभियानामध्ये जिल्ह्यातील ६९ गावांचा समावेश होता; परंतु या अभियानासाठी यावर्षी २०१६-१७ साठी फक्त २० गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांमधील काही गावे या अभियानामध्ये घेऊन गावांची संख्या वाढवावी, अशी विनंती शासनाला केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले. परंतु, तत्पूर्वी शासनाच्या टंचाई धोरणाच्या निकषामध्ये आपल्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे बसतात का, याचा अभ्यास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.