शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

‘जलयुक्त’मधील २० गावांत कामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 00:15 IST

अमित सैनी : पाणी साठविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : जलयुक्त शिवार या अभियानामध्ये २०१६-१७ या वर्षासाठी निवडलेल्या २० गावांमध्ये सात दिवसांत कामांना सुरुवात करण्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी संबंधित यंत्रणांना दिल्या. त्याचबरोबर या अभियानामध्ये गतवर्षी व यावर्षी समाविष्ट असणाऱ्या गावांमध्ये लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होऊन पाणी साठविण्यास मदत होईल, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेऊन नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास संबंधित विभागांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी सैनी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, वन विभागाचे उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील, आदी उपस्थित होते.या अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंत शासनाने मुदतवाढ दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार दोन महिन्यांत बंधारे बांधणे, तलावातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे, वन तलावांची देखभाल, टेकडावरून सलग समतल चर खणणे अशा स्वरूपाची कामे या सर्व विभागांनी पूर्ण करायची आहेत. जेणेकरून जूनपूर्वी ही कामे पूर्ण होतील व पावसाळ्यातील पाणी यामध्ये साचून त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर २०१६-१७ या वर्षासाठी या अभियानासाठी निवडलेल्या २० गावांमध्ये कामे सुरूकरण्यासंदर्भात येत्या सात दिवसांत नियोजन करून कामाला सुरुवात करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. या गावांमध्ये प्राधान्यक्रम हा तलावातील गाळ काढण्यास दिला जाणार आहे. कारण दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार असून, पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठण्यास मदत होईल, या दृष्टीने हे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानातील कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील बैठक १३ एप्रिलला होणार आहे. या बैठकीला महसूल, जिल्हा परिषद, कृषी, जलसंधारण, जलसंपदा, सामाजिक वनीकरण, वन विभाग, आदी विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)अभियानात गावे वाढविण्यास शासनाला विनंतीशासनाकडून गतवर्षी या अभियानामध्ये जिल्ह्यातील ६९ गावांचा समावेश होता; परंतु या अभियानासाठी यावर्षी २०१६-१७ साठी फक्त २० गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांमधील काही गावे या अभियानामध्ये घेऊन गावांची संख्या वाढवावी, अशी विनंती शासनाला केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले. परंतु, तत्पूर्वी शासनाच्या टंचाई धोरणाच्या निकषामध्ये आपल्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे बसतात का, याचा अभ्यास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.