शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

‘क्लीन चिट’ची एक खिडकी योजना सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:13 IST

कोल्हापूर : भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ देण्याची एक खिडकी योजना सुरू केली असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सद्य:स्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकारहा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेधार्ह ...

कोल्हापूर : भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ देण्याची एक खिडकी योजना सुरू केली असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सद्य:स्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकारहा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेधार्ह आहे. त्याचे समर्थन कुणी करणार नाही.मात्र त्यामध्ये राजकीय सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये. पोलीस अधिकाºयांच्या हातात अधिकार राहिले नसून, ते सरकारच्या हातातील बाहुले झाले आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही.जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रकार धक्कादायक असून, विशेष पथकाद्वारे या प्रकाराची चौकशी व्हावी.शिवसेनेचा समाचार घेताना विखे-पाटील म्हणाले, एकीकडे मुंबईत महापालिकेमध्ये सत्ता असताना ज्या दुर्घटना घडल्या, तेथे कोणतीही कारवाई करायची नाही आणि दुसरीकडे अहमदनगरला जेव्हा काही होते तेव्हा कारवाईची मागणी करायची हे दुटप्पी धोरण आहे. शिवसेनेकडून मुंबई, ठाण्यामध्ये केवळ बिल्डरांचे हितसंबंध जोपासत आर्थिक हितसंबंध जपण्याचे काम सुरू आहे. आम्ही सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली म्हणूनच राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. मुंबई महापालिकेवेळी एकमेकांची औकात काढणाºयांची आता बदललेल्या वातावरणामुळे भाषा बदलली आहे. सुरुवातीला ‘एकला चलो रे’ची भाषा बोलणारे भाजपचे नेते आता शिवसेनेला युतीचे आवाहन करीत आहेत.जागरण यात्रेची कोल्हापुरातून सुरुवातकेंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात महाराष्ट्रात जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातूनच या यात्रेची सुरुवात करण्याचे नियोजन असून त्यासाठी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना येण्याची विनंती केली आहे. अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीकडे हा प्रस्ताव गेला असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा नेली जाणार आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.