शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

‘क्लीन चिट’ची एक खिडकी योजना सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:13 IST

कोल्हापूर : भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ देण्याची एक खिडकी योजना सुरू केली असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सद्य:स्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकारहा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेधार्ह ...

कोल्हापूर : भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ देण्याची एक खिडकी योजना सुरू केली असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सद्य:स्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकारहा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेधार्ह आहे. त्याचे समर्थन कुणी करणार नाही.मात्र त्यामध्ये राजकीय सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये. पोलीस अधिकाºयांच्या हातात अधिकार राहिले नसून, ते सरकारच्या हातातील बाहुले झाले आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही.जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रकार धक्कादायक असून, विशेष पथकाद्वारे या प्रकाराची चौकशी व्हावी.शिवसेनेचा समाचार घेताना विखे-पाटील म्हणाले, एकीकडे मुंबईत महापालिकेमध्ये सत्ता असताना ज्या दुर्घटना घडल्या, तेथे कोणतीही कारवाई करायची नाही आणि दुसरीकडे अहमदनगरला जेव्हा काही होते तेव्हा कारवाईची मागणी करायची हे दुटप्पी धोरण आहे. शिवसेनेकडून मुंबई, ठाण्यामध्ये केवळ बिल्डरांचे हितसंबंध जोपासत आर्थिक हितसंबंध जपण्याचे काम सुरू आहे. आम्ही सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली म्हणूनच राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. मुंबई महापालिकेवेळी एकमेकांची औकात काढणाºयांची आता बदललेल्या वातावरणामुळे भाषा बदलली आहे. सुरुवातीला ‘एकला चलो रे’ची भाषा बोलणारे भाजपचे नेते आता शिवसेनेला युतीचे आवाहन करीत आहेत.जागरण यात्रेची कोल्हापुरातून सुरुवातकेंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात महाराष्ट्रात जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातूनच या यात्रेची सुरुवात करण्याचे नियोजन असून त्यासाठी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना येण्याची विनंती केली आहे. अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीकडे हा प्रस्ताव गेला असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा नेली जाणार आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.