शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करावा

By admin | Updated: October 7, 2016 00:46 IST

शिवसेनेची साखर आयुक्तांकडे मागणी : साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी

कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्री समितीने राज्यातील साखर कारखाने १ डिसेंबरला सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करावा. तत्पूर्वी जिल्ह्यातील साखर कारखाना प्रतिनिधींसमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.दुपारी संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने लक्ष्मीपुरी येथील साखर सहसंचालक कार्यालयात सचिन रावळ यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करून चर्चा केली.मंत्री समितीने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सन २०१६-१७ मध्ये उसाची लावण पाहता ऊस हंगाम लांबल्याने उसाचे वजन कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी सन २०१६-१७चा उस गळीत हंगाम सुरू करण्याची तारीख १ नोव्हेंबर २०१६ ही जाहीर करावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व आडसाली लावण करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. त्याचबरोबर २०१५-१६ ऊस गळीत हंगामातील ‘एफआरपी’ रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. ती न केल्यास कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. सन २०१६-१७ ऊस गळीत हंगामातील ऊस क्रमवारीने घ्यावा, अशा विविध मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय भोकरे, चंद्रकांत भोसले, भारत चव्हाण, तानाजी आंग्रे, प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, अभिजित किणे, के. के. राजिगरे, प्रवीण पालव, अभिजित बुकशेठ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयात गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने साखर सहसंचालक सचिन रावळ यांची भेट घेऊन ऊस गळीत हंगाम दि. १ नोव्हेंबरपासून सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, संजय भोकरे उपस्थित होते.