शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ

By admin | Updated: January 31, 2015 00:25 IST

बाहुबलीत हजारो भाविक : शांतीचा संदेश देणारा सोहळा : राजू शेट्टी

बाहुबली : भगवान बाहुबलींनी ‘अहिंसा, सत्य आणि जगा व जगू द्या’ चा उपदेश केला होता. तोच उपदेश ज्ञानदानाच्या माध्यमातून बाहुबली विद्यापीठ व आश्रम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हा महामस्तकाभिषेक सोहळा आहे. या महामहोत्सवाच्या माध्यमातून जगाला शांतीचा संदेश देण्याचा सोहळा आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.खा. शेट्टी भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी सनतकुमार आरवाडे अध्यक्षस्थानी होते. पू. १०८ वर्धमानसागर महाराज, क्षुल्लक समर्पणसागर महाराज, नयपद्मसागरजी मुनी उपस्थित होते.कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, महामहोत्सव सोहळा म्हणजे जैन व जैनेतर बांधवांना पुण्य प्राप्त करण्याचा प्रसंग आहे. दिगंबर व श्वेतांबर जैन बांधवांनी एकत्रितपणे येऊन कार्य करण्याची वेळ आहे. जैन समाजातील गरीब पण गरजू लोकांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. बाहुबली क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने विकासकामांना गती मिळाली. देशपातळीवर अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी आहे. नयपद्मसागर महाराजांनीदेखील दिगंबर-श्वेतांबर लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.समंतभद्र महाराजांनी आचार्यश्री शांतिसागर महाराजांच्या प्रेरणेने भगवान बाहुबलीची मूर्ती स्थापन केली आणि बाहुबलीशी आजूबाजूची ११७ गावे जोडली. महोत्सवादरम्यान लाखो भाविकांची उपस्थिती राहणार असून सर्वांनी आनंदाने या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष डी. सी. पाटील यांनी केले.क्षुल्लक समर्पणसागर महाराज, बी. टी. बेडगे यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी, आश्रममळा मंदिर, नेज येथे शांतिनाथ विधान झाले. ऐरावत हत्तीचे उद्घाटन आनंदभाई शहा यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी महावीर गाठ, विठ्ठल मोरे, सावकार मादनाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, बाबासाहेब पाटील, धनराज बाकलीवाल, डी. ए. पाटील, सुधाकर मणेरे, बबन पाटील, प्रकाश पाटील, भरत ओसवाल, अनिल मकोटे, अंबालालजी जैन, कलगोंड पाटील, तात्यासोा अथणे, गोमटेश बेडगे, रमेश देसाई आदी उपस्थित होते.